Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोली१०० रुपयांचा स्टॅम्प पेपर ११० रुपयांना…५ रुपयांची तिकीट १० रुपये तर १०...

१०० रुपयांचा स्टॅम्प पेपर ११० रुपयांना…५ रुपयांची तिकीट १० रुपये तर १० रुपयांची तिकीट १५ रुपये..-यावर आळा घालणार कोण?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- पूर्वी तसेच आजच्या आधुनिक युगात स्टॅम्प पेपरचे महत्व आजही कायम आहे.महत्वाचे म्हणजे शासकीय धोरणामुळे भाडे करार असो वा प्रतिज्ञापत्र,नवीन योजना,वारसाचे प्रमाण,ॲफेडेव्हिट, टेंडर,बँक कर्ज यासह विविध योजना मिळविण्यासाठी १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर बंधनकारक आहे.हा स्टॅम्प मिळविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक व्हेंडरकडे

 जातात.मात्र, प्रत्येक व्हेंडरकडे याचे दर वेगवेगळे आहेत.१०० रुपयांचे स्टॅम्प पेपर कुणी ११० तर कुणी १२० रुपये घेऊन सर्वसामान्य जनतेला चुना लावण्याचे काम करीत आहेत.गडचिरोली तहसील कार्यालय असो वा जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालय वा ज्याठिकाणी स्टॅम्प मिळतो; अशा ठिकाणी निर्धारित दरापेक्षा १० रुपये अतिरिक्त दर स्टॅम्पवर आकारण्यात येत आहे.हे अतिरिक्त दर दिल्याशिवाय स्टॅम्प दिल्या जात नाही.पूर्वी खरेदी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात स्टॅम्प लागत होते.आता ऑनलाइन पद्धत सुरू होऊनही अनेक कारणांसाठी स्टॅम्प खरेदी करण्यात येतात.मात्र १०० रुपयांच्या स्टॅम्प सोबतच ५ रुपयांची तिकीट १० रुपये तर १० रुपयांची तिकीट १५ रुपये आकारून आपलीच पोळी शेकण्याचा अनेकजण प्रयत्न करीत आहेत.अशातच नाईलाजास्तव सर्वसामान्य नागरिक तात्कळत वा हुज्जतबाजी घालण्यापेक्षा ‘चलती का नाम गाडी’ करून आपले काम होत आहे न..मग उगाच कशाला भानगडीत पडावे? असा विचार करुन अनेकजण हात झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत.मात्र सदर प्रकार चुकीचा आहे.त्यामुळेच अनेकांवर फटाके फुटले जातात.वाचा असूनही वाचा नसल्या सारखे करणे म्हणजे याला काय म्हणावे?मेहनत करेगा मुर्गा अन् अंडा खाये फकीर…. वारे ही लाकिर…! यावर आळा शासन घालुच शकत नाही? जो पर्यंत वाचा फुटणार नाही; तोपर्यंत अशीच अवस्था असणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!