- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सायबर चोरटे म्हणजेच ऑनलाईन फसवणूक करणारे गुन्हेगार विविध प्रकारच्या क्लुप्त्या वापरून सर्वसामान्य नागरिकांसह लखपती लोकांच्या घाम गाळून कमावलेला पैश्यांवर डल्ला मारत आहेत. कधी कोणती युक्ती वापरतील याचा नेम नाही.मागील महिन्यात ‘आरटीओ चालान’ च्या नावाने एपीके फाइल पाठवून मोबाईल हॅक करण्याचा प्रकार समोर आला होता.छत्रपती संभाजीनगरच्या छावणीतील एका मेडिकल व्यावसायिकाने आरटीओ चालान नावाची ‘एपीके’ फाइल इन्स्टॉल करताच क्षणात मोबाईल हॅक झाला आणि काहीच मिनिटांतच मोबाईलमधून ९ लाख रुपये गायब झाले होते.म्हणजेच बँकेतून झटपट रक्कम कपात झाल्याचे झटपट मॅसेज यायला सुरुवात झाली होती.अश्यातच आता सायबर चोरट्यांनी एक नवा फंडा आणला असून पॅन कार्डच्या नावाखाली स्कॅम सुरू केला आहे. ‘Download E-PAN’ नावाने येणाऱ्या बनावट ईमेलद्वारे लोकांना गंडवले जात आहे.हा ईमेल पाहून अनेकांना वाटते की सरकारकडून आलेली अधिकृत माहिती आहे,पण सत्य वेगळे आहे.हा ईमेल पूर्णपणे बनावट असून,त्यामधून तुमचे चं खाते,वैयक्तिक माहिती आणि डिजिटल सुरक्षा धोक्यात येऊ शकते.
स्कॅममध्ये नागरिकांना सांगितले जाते की, ‘तुमचे नवीन PAN 2.0 कार्ड तयार आहे.खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ते डाउनलोड करा.’ ईमेलमध्ये सरकारी लोगो,QR कोड,आणि आकर्षक डिझाईन दिले जाते जे पाहून तो अधिकृत वाटतो.पण,खरा हेतू वेगळाच असतो त्या लिंकवर क्लिक करताच तुम्ही स्कॅमर्सच्या बनावट वेबसाइटवर पोहोचता.त्या बनावट वेबसाइटवर तुमच्याकडून नाव,मोबाईल नंबर,आधार क्रमांक,पॅन नंबर,बँक डिटेल्स,पासवर्ड्स अशी महत्त्वाची माहिती मागवली जाते.एकदा ही माहिती दिल्यावर तुमच्या बँक खात्यातून पैसे चोरले जाऊ शकतात.त्याचा गैरवापर करून तुमच्यावर कर्ज काढले जाऊ शकते किंवा ओळखचोरीही होऊ शकते.त्यामुळे कोणत्याही अनोळखी ईमेलवरील लिंकवर क्लिक करू नका.फक्त अधिकृत वेबसाइट्सचा वापर करा उदाहरणार्थ,पॅनसंबंधित माहिती किंवा सेवा हवी असल्यास www.incometax.gov.in या वेबसाइटलाच भेट द्या.
बँक किंवा आर्थिक व्यवहारासंबंधित माहिती कुठेही सहज देऊ नका.ई-पॅनच्या नावाने सुरु झालेला ‘PAN 2.0’ स्कॅम सामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहे. माहितीअभावी अनेक जण त्यात अडकत आहेत. त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तींना असा ईमेल आल्यास जागरूक राहा आणि योग्य ती खबरदारी घ्या.सावधगिरी बाळगणे हीच खरी सुरक्षा आहे.
- Advertisement -

