Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान..! वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत होणार वाढ.. - संजय सरोवर धरणाचे तीन...

सावधान..! वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत होणार वाढ.. – संजय सरोवर धरणाचे तीन दरवाजे खुले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत पावसाने विश्रांती घेतल्यासारखी स्थिती आहे.यापूर्वी राज्यासह विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावत सगळीकडे पाणीच पाणी होऊन वैनगंगा नदीची सामान्य पाणी पातळी राखण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले होते.त्यामुळे वैनगंगा नदीला पूर येऊन हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊन पिकांचे नुकसान झाले होते.अश्यातच आता मध्य प्रदेशात धो- धो पाऊस बरसत असल्याने पूर सदृश परिस्थिती लक्षात घेता आज,बुधवार १६ जुलै संजय सरोवर धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहे.विशेष म्हणजे,संजय सरोवर धरण हे मध्य प्रदेशाच्या सिवनी जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर बांधण्यात आले असून आशिया खंडातील सर्वात मोठा धरण आहे.संजय सरोवर धरणाचे पाणी वैनगंगा नदीला येत असल्याने तसेच धरणातून सुमारे २० हजार ५०६ क्युमेक पाणी सोडण्यात येणार असल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे.त्यानुसार नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सध्या कारधा येथील वैनगंगा नदीची पाणी पातळी २४२.२२ मीटर आहे.त्याच वेळी, धोक्याची पाणी पातळी २४५.५० मीटर आहे.मध्य प्रदेशात पाऊस सुरू झाला आहे.नद्या आणि नाल्यांची पाणी पातळी वेगाने वाढत आहे.त्यामुळे संजय सरोवर धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे येत्या काही दिवसांत वैनगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढू शकते. सध्या गोसेखुर्द धरणाचे पाच दरवाजे उघडून ७२६ क्युमेक पाणी सोडण्यात येत आहे.त्याचप्रमाणे धापेवाडा बॅरेजचे सात दरवाजे देखील उघडण्यात आले आहेत. अश्यातच आता पाऊस पडला तर वैनगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढेल आणि परत मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!