Wednesday, June 10, 2026
Homeकोंढाळासावधान..! कोंढाळा जंगल परिसरात वाघाने गायीच्या गोरीला केले ठार..

सावधान..! कोंढाळा जंगल परिसरात वाघाने गायीच्या गोरीला केले ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-कोंढाळा जंगल परिसराच्या कक्ष क्रमांक-८०९ मध्ये वाघाने गायीच्या गोरीला ठार केल्याची घटना आज,शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा – रवी मार्गावरील बारसागडी तलाव परिसरात उघडकीस आल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.
कोंढाळा गावातील शेतकऱ्यांच्या शेत्या रवी मार्गावरील अगदी बारसागडी तलाव परिसराला लागूनच असल्याने गुराखी गुरे चारण्यासाठी याच परिसरात नेत असतात. जंगलात वाघाचे वास्तव्य असल्याने गुराखी तसेच नागरिक जंगलात जाण्याचे टाळत आहेत.अश्यातच काल गुरुवारी गावातील गुराखी शेतशिवाराला लागून असलेल्या बारसागडी तलाव परिसरात गुरे चराईसाठी गेले होते.सायंकाळी गुरांचा कळप गावात परतला.मात्र, कोंढाळा गावातील शेतकरी विठ्ठल सोमा पेटकुले वय ४५ वर्षे यांच्या मालकीच्या गायीची गोरी कळपातून घरी परतली नाही.त्यामुळे त्यांनी परिसरात शोधाशोध केली. परिसरात शोधाशोध करूनही सापडली नसल्याने शेवटी त्यांनी गावातील महिला वनरक्षक नीलिमा सेलोटे यांना याबाबत माहिती दिली.वनरक्षक सेलोटे यांनी तात्काळ गावातील सहकारी अरुण दुपारे,गुरुदेव ठाकरे व जयानंद बुल्ले यांना सोबत घेऊन बारसागडी तलाव जंगल परिसरात शोधाशोध केली असता आज सकाळच्या सुमारास कोंढाळा-रवी मार्गावरील कक्ष क्रमांक-८०९ मध्ये  वाघाने गायीच्या गोरीला ठार केल्याचे आढळून आले.माहितीनुसार,वाघाने रात्रीपासून गोरीचे संपूर्ण शरीर खाऊन काही अंश ठेवले होते.घटनास्थळी वाघाचे पगमार्कही आढळून आले.घटनेबाबत वनरक्षक सेलोटे यांनी वनक्षेत्र सहाय्यक संदीप शेंडे यांना माहिती दिली व  पंचनामा करून पुढील प्रक्रिया पार पाडण्यात आली. प्रसंगी वन विभागाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यास लवकरात-लवकर भरपाई देण्यात येणार असल्याचे शेंडे यांनी सांगितले.
  • संदीप शेंडे,वनक्षेत्र सहाय्यक देसाईगंज👇
कोंढाळा,ऊसेगाव,शिवराजपुर व इतर जंगल परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याने नागरिकांनी जंगल परिसरात जाण्याचे टाळावे.वन्य प्राण्यांच्या हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी जंगल परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून गावातील वनरक्षक यांचेकडून दररोज त्यांची तपासणी करण्यात येते.एखादा अनुचित प्रकार घडू नये,याकरीता नागरिकांना वेळोवेळी सतर्क राहण्याच्या सूचना वन विभागाच्या वतीने देण्यात येत आहेत.नागरिकांनी त्यांचे पालन करणे करावे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!