- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील अवैध रेती उत्खनन आणि गौण खनिज वाहतुक प्रकरणी कधी न घडलेली घटना १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी उघडकीस आली होती.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मंडळ अधिकारी राजू गणपतराव खोब्रागडे आणि तलाठी अश्विनी सडमेक यांना बुधवार १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी निलंबित करून तहसीलदार निलेश होनमोरे यांच्यावर निष्काळजीपणा आणि नियंत्रण न ठेवल्याबद्दल कारवाई करून बदली करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे केली होती.त्यानंतर, तहसिलदारांची पोलखोल झाल्याने सिरोंचा तहसील कार्यालयाचे तहसीलदार नीलेश होनमोरे यांनाही निलंबित करण्यात आले.शासनाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी शुक्रवार ७ नोव्हेंबरला निलंबन आदेश जारी केले होते.विशेष म्हणजे,तलाठी अश्विनी सडमेक यांनी अवैध रेती उत्खनन तथा साठा प्रकरणी तहसीलदार यांना लागोपाठ सहा अहवाल दिले होते.मात्र,त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.त्यामुळे तलाठी अश्विनी सडमेक यांचे निलंबन रद्द करून पूर्ववत सेवेत रुजू करण्यात आले.मात्र,अद्याप जिल्ह्यात अवैध रेती प्रकरणातील निलंबनाच्या दोन विकेटी अजूनही कायम आहेत.अश्यातच आता रेती तस्करांनी सावंगी आणि आमगाव रेती घाटांवर डल्ला मारणे सुरू केल्याने चौकशी झाल्यास अवैध रेती उत्खनन प्रकरणी कुणाची विकेट पडणार? हे सांगता येणार नाही.
अवैध रेती तस्करीत अनेकांना पाकिटे वाटप केली जात असली तरीही कुणाचे बचाव कार्य केले जात नाही.चोरटे चोऱ्या करून मोकळे होत असतात.त्यातच,काहींना गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय पर्यायच नाही.त्यामुळे ‘इकडे तिकडे चोहीकडे’ अवैध गौण खनिजांची तस्करी करून शासनाच्या महसुलास कोट्यवधी रुपयांचा चुना लावून तरुण वर्गांना गुन्हेगारीच्या खाईत ढकलण्याचे काम सुरू असल्याचे चित्र आहे.दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चेनुसार,मिळणारे पाकीट हे क्षणिक आणि लाख मोलाचे नसून केवळ एका रात्रीचा विचार केला तर
‘पर नाईट’ दोन लाख रुपयांची अवैध रेतीची तस्करी केली जात आहे.एका सप्ताहाचा विचार केला तर तब्बल १४ लाख रुपयांची रोख रक्कम तस्करीच्या मार्गाने मिळत असल्याचे बोलले जात आहे.काही ठिकाणी पकडलेले अवैध रेतीचे टीप्पर सोडून ‘मी किती इमाने इतबारे तुमच्यासाठी काम करतोय’, अशी इमानदारीही काहींनी चालवली आहे.त्यामुळे,रेती तस्करांची चांगलीच चांदी सुरू आहे.यावर आळा घालण्यासाठी आंदोलन उभारावे लागेल की काय?असे सुजाण नागरिकांचे म्हणणे आहे.
- Advertisement -

