- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येताच गोर-गरिबांसह सर्वसामान्यांसाठी जणूकाही पैश्यांची बरसातच होऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार,शेतकऱ्यांसाठी दोन हजार,निराधार,अपंगांसाठी पुढच्या महिन्यापासून अडीच हजार रुपये,शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस, नुकसानभरपाई व इतर अनेक योजनांच्या माध्यमातून पैश्यांचा ‘खेला हॉबे’ सुरू झालाय.सरकार सर्वसामान्यांच्याच खिशालाच चुना लावते,हे तुम्हालाही माहीत आहे.पण,गोर-गरिबांच्या अडीअडचणीच्या काळात सरकारच कामात पडू लागली आहे.हेही तितकेच खरे.काल मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात आले.अश्यातच
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी जुलै महिन्याचे दीड हजार रुपये रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले होते.त्यातच ऑगस्ट महिन्याचे दीड हजार रुपये आणि सध्या सुरू असलेल्या सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये असे दोन्ही महिन्यांचे लाभ एकत्रित वितरीत करण्यात येणार,अशी अपेक्षा होती.मात्र,शासनाने आता मागील ऑगस्ट महिन्याचा निधी स्वतंत्रपणे जारी केला आहे. त्यानुसार राज्य शासनाने सामाजिक न्याय विभागाकडून ३४४ कोटी रुपये लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा लाभ अदा करण्यासाठी वितरित केला आहे.त्यामुळे राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा लाभ लवकरच खात्यात जमा करण्यात येणार आहे.याबाबत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे लवकरच घोषणा करणार आहेत.
- Advertisement -

