- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील येत्या,शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणावर बसणार असल्याने सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज,सोमवार २५ ऑगस्ट रोजी जालना येथील
आयोजित एका पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले की,येत्या,बुधवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून निघून त्याच दिवशी जुन्नर येथील शिवनेरी गडावर पोहचून दुसऱ्या दिवशी गुरुवार २८ ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडावरील पवित्र माती कपाळावर लावून राजगुरू खेड मार्गे आपण चाकणला जाऊ.तेथून तळेगाव,लोणावळा,पणवेल, वाशी,चेंबूर मार्गे २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी आपण आझाद मैदानाला पोहोचणार आहोत.त्यानंतर शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी सकाळपासून आपले आझाद मैदानावर उपोषण सुरू होईल.मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीही अनेकदा मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण केले असून त्यांच्यासाठी लाखो मराठा बांधव पुढे सरसावले आहेत.अश्यातच आता मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण असल्याने मराठा आरक्षणावर सरकार काय भूमिका घेते,याकडे सर्वांच्या नजरा भिडलेल्या असतील.
- Advertisement -

