गोंदिया :-राज्यात सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून बहुतांश भागांत किमान तापमानात लक्षणीय घट होण्यास सुरुवात झाली आहे.सध्या स्थितीत राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट पसरल्याचे चित्र असून नागरिक ठिकठिकाणी शेकोट्यांचा आधार घेत आहेत.मुंबई,पुणे,कोकण, मराठवाडा,विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील आठवडाभर थंडीची तीव्रता कायम राहील,असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार,राज्याच्या उत्तरेकडील भागांपासून मराठवाड्यापर्यंत काही दिवसांत तापमानात लक्षणीय घट होणार आहे.त्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागापासून ते शहरांपर्यंत सर्वत्र शेकोट्या पेटल्याचे दृश्य दिसत आहे.थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक,शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक उबदार कपड्यांचा वापर करत आहेत. सकाळी लवकर कामावर निघणाऱ्या दूध विक्रेत्यांना, भाजी विक्रेत्यांना आणि औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांना या कडाक्याच्या थंडीचा जास्त सामना करावा लागत आहे.थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने बाजारात उबदार कपड्यांच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे.राज्यात राजकीय वातावरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे तापले असले तरी, दुसरीकडे ही वाढलेली थंडी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे.गहू आणि हरभरा यांसारख्या रब्बी पिकांसाठी सध्याचे तापमान अत्यंत पोषक असून,अनेक ठिकाणी रब्बी हंगामाच्या पेरण्यांनी वेग घेतल्याचे दिसून येत आहे.अश्यातच गत सप्ताहापासून गोंदिया शहराचा पारा चांगलाच घसरला असून काल रविवारी संपूर्ण विदर्भात गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक कमी ९.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.कडाक्याच्या थंडीने शहर गारठू लागले आहे.शहरावर सकाळी हलक्या धुक्याचे साम्राज्य पसरत असल्याने नागरिकांचा दिवस उशिराने सुरू होत आहे.वाढत्या थंडीमुळे बाजारात उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे.
संपूर्ण विदर्भात गोंदिया जिल्हा सर्वाधिक “कुल”.. – पुढील आठवडाभर थंडीची तीव्रता कायम..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

