Wednesday, April 15, 2026
Homeनवी दिल्लीश्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब विषयी पोलिसांकडून मोठा खुलासा...- हत्येनंतर हाडे...

श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब विषयी पोलिसांकडून मोठा खुलासा…- हत्येनंतर हाडे मिक्सरमधे टाकून केला चुराडा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नवी दिल्ली :- संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात अजून काही धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत.श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब पुनावाला याने तिची हाडे मिक्सरमध्ये टाकून त्याचा चुरा केला होता.यानंतर त्याने त्या राखेची विल्हेवाट लावली होती असा दिल्ली पोलिसांचा दावा आहे.आफताबने मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर जंगलात फेकून दिले होते. यामध्ये तिचे मुंडके सर्वात शेवटी होते. त्याने तब्बल तीन महिन्यांनी हे मुंडके फेकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी पोलिसांनी ६६०० पानांचे चार्जशीट दाखल केले आहे. चार्जशीटमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार,१८ मे २०२२ रोजी हत्येच्या रात्री आफताबने झोमॅटोवरुन (Zomato) चिकन रोल मागवले होते.कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतर श्रद्धा आफताबसह दिल्लीत वास्तव्यास आली होती.पण दिल्लीत आल्यानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये वाद सुरु झाले होते.घरखर्च,आफताबची प्रेयसी अशा अनेक मुद्द्यांवरुन दोघांमध्ये खटके उडू लागले होते. चार्जशीटमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, आफताबच्या दिल्लीपासून ते दुबईपर्यंत प्रेयसी होत्या. ८ मे रोजी दोघेही मुंबईला जाणार होते.पण अचानक आफताबने तिकीट रद्द केले होते. यावरुन दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झाले होते.भांडणादरम्यान आफताबने गळा दाबून श्रद्धाची हत्या केली. चार्जशीटमध्ये सांगितले आहे.त्यानुसारआफताबने प्रथम मृतदेह एका प्लास्टिक पिशवीत गुंडाळून फेकून देण्याचा विचार केला होता.त्याने त्यासाठी पिशवीही विकत आणली होती.पण आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने ही योजना रद्द केली.यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केले.यासाठी त्याने एक करवत,एक हातोडा आणि तीन चाकू विकत घेतले.बोटे वेगळी करण्यासाठी त्याने ब्लो टॉर्चचा वापर केला. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवून दिले.जेव्हा कधी घरी प्रेयसी यायच्या तेव्हा आफताब फ्रीजमधून मृतदेहाचे तुकडे काढून ते किचनमध्ये ठेवत असे असं पोलिसांनी सांगितले आहे. आफताबने श्रद्धाचा फोन आपल्याकडेच ठेवला होता. १८ मे नंतर तोच श्रद्धाच्या अकाऊंटचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.यानंतर त्याने तिच्या मोबाइलची विल्हेवाट लावली होती.पोलिसांना मृतदेहाचे २० तुकडे सापडले आहेत.पण अद्याप मुंडके सापडलेले नाही.पॉलीग्राफ आणि नार्को-टेस्टमध्ये आफताबने आपला गुन्हा कबूल केला आहे. यावेळी त्याने आपल्याला पश्चाताप होत असल्याचे म्हटले असल्याचाही उल्लेख चार्जशीटमध्ये आहे. आफताबचा कबुली जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही.त्याने पोलिसांसमोर दिलेला पहिला कबुलीजबाबही न्यायालयात वापरता येत नाही.अटक केलेल्या व्यक्तीने दिलेला दाखला केवळ न्यायदंडाधिकार्‍यासमोर सादर केल्यावरच पुरावा म्हणून वापरता येतो.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!