- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-शेतात बैलजोडीने चिखलणी करीत असतांना लाकडी फणीमध्ये पाय अडकल्याने बैलजोडीने शेतकऱ्यास चिखलातून फरफटत नेल्याने एका ४५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज, शुक्रवार १३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास लाखांदूर तालुक्याच्या मांदेड गाव नजीकच्या शेत शिवारात घडली.मधुकर नामदेव राऊत वय ४५ वर्षे,रा.मांदेड, ता.लाखांदूर,जि.भंडारा असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
आज सकाळच्या सुमारास मधुकर राऊत हे शेतात उन्हाळी धानाच्या रोवणीसाठी बैलजोडीने चिखलणी करीत होते.लाकडी फळीवर उभे राहून बैलजोडीच्या सहाय्याने चिखलणी करीत असतांनाच दुपारच्या सुमारास त्यांचा एक पाय लाकडी फणीमध्ये अडकला. पाय अडकताच बैलजोडी न थांबता जोरजोराने पुढे जाऊ लागली.यात शेतकरी मधुकर राऊत चिखलात कोसळून फरफटत गेल्याने हातापायांना तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान,त्यांचे भाऊ मनोहर राऊत शेतावर गेले असता सदरची बाब निदर्शनास येताच ग्रामस्थांशी संपर्क साधून त्यांना तात्काळ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी अंती मधुकर राऊत यांना मृत घोषित केले.घटनेने परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

