Wednesday, May 27, 2026
Homeभंडाराशेतकऱ्याचा शेतातच दुर्दैवी मृत्यू..!

शेतकऱ्याचा शेतातच दुर्दैवी मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शेतात बैलजोडीने चिखलणी करीत असतांना लाकडी फणीमध्ये पाय अडकल्याने बैलजोडीने शेतकऱ्यास चिखलातून फरफटत नेल्याने एका ४५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज, शुक्रवार १३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास लाखांदूर तालुक्याच्या मांदेड गाव नजीकच्या शेत शिवारात घडली.मधुकर नामदेव राऊत वय ४५ वर्षे,रा.मांदेड, ता.लाखांदूर,जि.भंडारा असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
आज सकाळच्या सुमारास मधुकर राऊत हे शेतात उन्हाळी धानाच्या रोवणीसाठी बैलजोडीने चिखलणी करीत होते.लाकडी फळीवर उभे राहून बैलजोडीच्या सहाय्याने चिखलणी करीत असतांनाच दुपारच्या सुमारास त्यांचा एक पाय लाकडी फणीमध्ये अडकला. पाय अडकताच बैलजोडी न थांबता जोरजोराने पुढे जाऊ लागली.यात शेतकरी मधुकर राऊत चिखलात कोसळून फरफटत गेल्याने हातापायांना तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान,त्यांचे भाऊ मनोहर राऊत शेतावर गेले असता सदरची बाब निदर्शनास येताच ग्रामस्थांशी संपर्क साधून त्यांना तात्काळ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी अंती मधुकर राऊत यांना मृत घोषित केले.घटनेने परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!