Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीव्यावसायिकांकडून लाखो रुपयांच्या हव्यासापोटी नियमांना तिलांजली.. - विनापरवाना खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय...

व्यावसायिकांकडून लाखो रुपयांच्या हव्यासापोटी नियमांना तिलांजली.. – विनापरवाना खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय फोफावले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-कुठलाही व्यवसाय करायचा असेल,तर त्यासाठी एफडीए(अन्न व औषध प्रशासन)व नगरपरिषद,नगरपंचायत वा ग्रामपंचायत या ठिकाणी नोंदणी करणे अनिवार्य आहे.व्यवसाय करतांना कुठल्या नियमांचे पालन केले पाहिजे,यासंदर्भात काही नियमही ठरवून दिलेले आहे.मात्र,सर्व नियम धाब्यावर बसवून शहरासह जिल्ह्यात विनापरवाना खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय फोफावले आहेत.
कुठल्याही चौकात जा,त्याठिकाणी अतिक्रमण करून ठिकठिकाणी उघड्‌यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या लावलेल्या निदर्शनास येतात.शहरात या व्यवसायातून दररोज लाखो रुपये कमावले जातात. तथापि,जनआरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते.लाखो रुपयांच्या या व्यवसायापोटी सर्व नियमांना व्यावसायिकांकडून तिलांजली दिली जात असल्याचे वास्तव आहे.त्या ठिकाणी दूषित पाण्याचा वापर ग्राहकांना पिण्याकरिता केला जातो.स्वच्छता पाळली जात नाही.ज्याठिकाणी अन्नपदार्थ तयार केले जातात.तेथे पाळीव प्राण्यांचा संचार असतो.प्लेट धुण्यासाठी स्वच्छ पाण्याचा स्वतंत्ररित्या वापर केला जात नाही.तसेच बेसिंगची स्वतंत्र व्यवस्था नसते. एफडीएने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे; असे व्यवसायासाठी नोंदणी करतांना किंवा परवाना घेतांना नियमावली ठरवून दिलेली असते.मात्र,या नियमावलीचे कुठेच पालन होत नाही.बहुतांश प्रकरणात व्यवसायाची नोंदणी व परवानाही नसतो. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!