- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-कुठलाही व्यवसाय करायचा असेल,तर त्यासाठी एफडीए(अन्न व औषध प्रशासन)व नगरपरिषद,नगरपंचायत वा ग्रामपंचायत या ठिकाणी नोंदणी करणे अनिवार्य आहे.व्यवसाय करतांना कुठल्या नियमांचे पालन केले पाहिजे,यासंदर्भात काही नियमही ठरवून दिलेले आहे.मात्र,सर्व नियम धाब्यावर बसवून शहरासह जिल्ह्यात विनापरवाना खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय फोफावले आहेत.
कुठल्याही चौकात जा,त्याठिकाणी अतिक्रमण करून ठिकठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या लावलेल्या निदर्शनास येतात.शहरात या व्यवसायातून दररोज लाखो रुपये कमावले जातात. तथापि,जनआरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते.लाखो रुपयांच्या या व्यवसायापोटी सर्व नियमांना व्यावसायिकांकडून तिलांजली दिली जात असल्याचे वास्तव आहे.त्या ठिकाणी दूषित पाण्याचा वापर ग्राहकांना पिण्याकरिता केला जातो.स्वच्छता पाळली जात नाही.ज्याठिकाणी अन्नपदार्थ तयार केले जातात.तेथे पाळीव प्राण्यांचा संचार असतो.प्लेट धुण्यासाठी स्वच्छ पाण्याचा स्वतंत्ररित्या वापर केला जात नाही.तसेच बेसिंगची स्वतंत्र व्यवस्था नसते. एफडीएने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे; असे व्यवसायासाठी नोंदणी करतांना किंवा परवाना घेतांना नियमावली ठरवून दिलेली असते.मात्र,या नियमावलीचे कुठेच पालन होत नाही.बहुतांश प्रकरणात व्यवसायाची नोंदणी व परवानाही नसतो. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
- Advertisement -

