Thursday, April 16, 2026
Homeनागपूरविम्याच्या उर्वरित रकमेसाठी ग्राहक निवारण आयोगात तक्रार... - विम्याच्या रकमेसह पीडितांना शारीरिक,मानसिक...

विम्याच्या उर्वरित रकमेसाठी ग्राहक निवारण आयोगात तक्रार… – विम्याच्या रकमेसह पीडितांना शारीरिक,मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटीही भरपाई मंजूर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-आपण अनेकदा एखादी वस्तू,जमीन खरेदी-विक्री,कपडे खरेदी,वाहन खरेदी व इतर प्रकरणांत आपली फसवणूक केली जाते.तरीही आपण गप्प राहून ‘जाऊ द्या न..!’ असे करीत असतो.कारण त्याबद्दल आम्हाला माहिती नसते व त्याचे बळी पडून फसवणूक करणाऱ्यांची व आपल्या हक्कावर गदा आणणाऱ्यांची कॉलर टाइट होत असते.ग्राहक हा राजा असतो.हे काहीजणांना माहीतच नसते.त्यामुळे शासनाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हा स्तरावर ग्राहक तक्रार निवारण मंच म्हणजेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यालये स्थापन केली आहेत.त्यानुसार ग्राहक विद्युत पुरवठा विभाग,विमा पॉलिसी कंपन्या,घरगुती गॅस सिलेंडर,कपड्यांची दुकाने, मोबाईलची दुकाने,हॉटेल,पेट्रोल पंप,खाद्य दुकाने व इतर नाना तऱ्हेचे दुकानांविरुद्ध एक रुपयांपासून ते अमर्याद फसवणूक,जास्तीची किंमत घेणे,नकली वस्तू पुरवठा वा इतर बाबिंविरुद्ध ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये तक्रार दाखल करू शकतात.त्या ठिकाणी वकील करण्याची गरज नसते,आपण स्वतः आपली बाजू मांडू शकतो.अश्याच प्रकारे नागपूरच्या एका प्रकरणात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आरोग्य विमाधारकाच्या पत्नी व मुलाला १ लाख ४५ हजार २१७ रुपये ९ टक्के व्याजासह अदा करा,असा आदेश दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे.व्याज हे २८ डिसेंबर २०२० ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे.तसेच,पीडितांना शारीरिक मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी २० हजार रुपये भरपाईही मंजूर करण्यात आली.निधी व वैदिक पिंपळापुरे,असे पत्नी व मुलाचे नाव आहे.आयोगाचे अध्यक्ष सचिन शिंपी व सदस्य बाळकृष्ण चौधरी यांनी त्यांना दिलासा दिला आहे.मनोज पिंपळापुरे,असे मृताचे नाव होते.त्यांनी दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची मेडिक्लेम पॉलिसी काढली होती.त्यात चार लाख रुपयाचे विमा संरक्षण होते.मनोज यांचे पॉलिसी कालावधीत आजारपणामुळे निधन झाले.त्यानंतर निधी यांनी कंपनीकडे ३ लाख १ हजार ३३६ रुपयांचा दावा दाखल केला असता,त्यांना केवळ १ लाख ४१ हजार ५७५ रुपये देण्यात आले. परिणामी,त्यांनी उर्वरित रकमेसाठी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती.आयोगाने विविध बाबी लक्षात घेता निर्णय दिला असून मयताचे पत्नी व मुलास एकप्रकारे आयोगाकडून दिलासा मिळाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने...

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!