- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-वाळू तस्करीला आळा बसावा आणि नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी,या उद्देशाने शासनाने वाळू डेपो पद्धती सुरू केली.वाळू हवी असल्यास आधी ऑनलाईन बुकिंग करायची. त्यानंतर डेपोमधून वाळूची उचल करायची.या डेपो पद्धतीमुळे वाळू चोरी थांबेल,असा शासनकर्त्यांचा समज होता.मात्र,त्यांचा हा समज पूर्णतः फोल ठरला आहे. ट्रकमध्ये ५ ते १५ ब्रासपर्यंत वाळू भरली जाते. मात्र,चालकाला रॉयल्टी केवळ २ ते ३ ब्रासचीच देण्यात येते.नाव न लिहिण्याच्या अटीवर काही कार्यकर्त्यांनी सांगितले की,काही डेपो चालक वेगवेगळ्या व्यक्तीच्या आधारकार्डची मदत घेऊन स्वतःच वाळूची ऑनलाईन बुकिंग करतात.त्यामुळे एखादा ग्राहक डेपोचे नाव टाकून ऑनलाईन बुकिंग करण्याचा प्रयत्न करतो,तेव्हा त्याला बुकिंग फुल्ल झाल्याचे आढळून येते.काही डेपोची बुकिंग मध्यरात्रीला सुरू होऊन दोन-तीन तासांच्या अवधीतच बंद केली जाते.या दोन-तीन तासांच्या अवधीत डेपो चालक बोगस नावाने वाळूची बुकिंग करतात.वाळू डेपोमधून रॉयल्टीपेक्षा कितीतरी पटीने अधिक वाळू उपसा करून ती नागपूर,वर्धा, अमरावती व इतर जिल्ह्यात नेऊन विकण्याचा गोरखधंदा सुरू आहे.रेतीचा उपसा ही काही नवीन बाब नाही.मात्र, यातून रोज कोट्यवधीचा महसूल बुडत आहे.दुसरीकडे काही डेपो चालक व त्यांना मदत करणारे अधिकारी मालामाल होत आहेत.हा सर्व प्रकार थांबवून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
- Advertisement -

