- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात काल,९ सप्टेंबर रोजी वादळ,वारा आणि मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले होते.काही भागात मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अती मुसळधार पाऊस पडल्याने देसाईगंज तालुक्याच्या चिखली रिठ, चिखली तूकुम,कीन्हाळा-मोहटोला येथील शेतकरी बांधवांचे उभे असलेले धानपीक भुईसपाट झाल्यानेशेतकऱ्यांच्या डोळ्यांतून दुःखाश्रू वाहू लागले आहेत.अशातच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे रामदास मसराम यांनी आज, मंगळवार दिनांक-१० सप्टेंबरला सकाळच्या सुमारास परिसरातील शेतकऱ्यांच्या शेत बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करीत शेतकरी बांधवांना धीर देत देसाईगंज तहसीलदार यांना संपर्क साधत तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
कित्तेक दिवसांपासून शेतकरी बांधव शेतीसाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते.बऱ्याच प्रतीक्षेनंतर काल,९ सप्टेंबर पासून पावसाचे आगमन झाले.पावसाने हजेरी तर लावली; मात्र,देसाईगंज तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान करून तोंडातील घास हिरावून घेतला आहे.तालुक्यातील चिखली रिठ,चिखली तूकुम,कीन्हाळा-मोहटोला येथील शेतकऱ्यांचे उभे धानपीक अक्षरशः झोपलेल्या अवस्थेत गेल्याने काय करावे? असा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनात घर करून सोडत आहे.शेतकरी बांधवांनी सर्व जमापुंजी शेतीसाठी खर्चिक घातली; अशातच धानपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त होऊन आर्थिक संकटात सापडला आहे.काँग्रेस नेते रामदास मसराम यांनी शेतकरी बांधवांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ दखल घेण्याची मागणी तहसीलदार यांना केली.त्यानुसार देसाईगंजच्या तहसीलदार प्रीती डूडूलकर यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत स्थानिक तलाठी तसेच कर्मचारी वर्गांना कळविले आहे.
- Advertisement -

