Saturday, August 1, 2026
Homeनागपूरवडिलांची नाही तर आईची कागदपत्रे विचारात घेऊन जात वैधता प्रमाणपत्र जारी करण्याचे...

वडिलांची नाही तर आईची कागदपत्रे विचारात घेऊन जात वैधता प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कित्तेक प्रकरणांमध्ये केवळ वडिलांच्या नावांची कागदपत्रे विचारात घेऊन जात प्रमाणपत्र,जात वैधता प्रमाणपत्र,उत्पन्नाचा दाखला व इतर महत्वाची दस्तऐवजे वेगवेगळ्या ठिकाणी द्यावी लागत असतात. मात्र,वेगळे राहत असलेल्या वडिलांनी जर कां कागदपत्रे देण्यास नकार दिल्यास मुलांचे भवितव्य अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही.असाच प्रकार एका मुलाच्या बाबतीत घडल्याने त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.प्रकरणी न्यायलयाने दिलेल्या निर्णयाने अनेक मुलांचे भवितव्य अंधारातून उजेडात आले आहे.न्यायलयाने जन्म झाल्यापासूनच वडिलांसोबत राहत नसलेल्या मुलाला आईची कागदपत्रे विचारात घेऊन जात वैधता प्रमाणपत्र(कास्ट व्हॅलिडीटी) जारी करण्यावर निर्णय घ्या,असा आदेश भंडारा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिला असून याकरिता समितीला २० फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.
प्रकरणामध्ये मुलाचे आई-वडील त्याच्या जन्मापूर्वीच वेगळे झाले.त्यामुळे तो जन्मापासून आईसोबत राहत आहे.वडिलांचा त्याच्या पालनपोषणाला काहीच हातभार लागला नाही.आईनेच कष्ट करून त्याला लहानाचे मोठे केले आणि उच्चशिक्षणाकरिता पात्र केले.मुलाचे वडील मध्यप्रदेश तर,आई महाराष्ट्रातील रहिवासी आहे.दोघेही लोहार जातीचे असून ही जात या दोन्ही राज्यांमध्ये भटक्या जमाती प्रवर्गामध्ये मोडते.असे असतांना वडिलांच्या जातीची कागदपत्रे सादर केली नाही,या कारणामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ९ डिसेंबर २०२१ रोजी मुलाला लोहार-भटक्या जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र नाकारले.परिणामी,मुलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून या निर्णयाला आव्हान दिले होते.याचिकेवर न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर व नंदेश देशपांडे यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी झाली.दरम्यान,मुलाचे वकील ॲड.शैलेश नारनवरे यांनी प्रकरणातील तथ्यांकडे लक्ष वेधून जातवैधता प्रमाणपत्रासाठी वडिलांची कागदपत्रे मागणे मुलाकरिता अन्यायकारक आहे,असा दावा केला.तसेच,मुलगा वडिलांची कागदपत्रे देऊ शकत नाही.त्यामुळे त्याला आईचेच कागदपत्रे विचारात घेऊन जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे,अशी मागणी केली. त्यानुसार,मुलाला आईच्या कागदपत्रांवरून जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णय दिला.यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन चिमुकल्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; आज दुपारच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मौजा-खेडेगाव येथे आज,शनिवार १ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी...

अखेर पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ इसमाचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच अखेर...

युरोप आणि चीन दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात.सन २०२६-२७ साठी राज्य पुरस्कृत या योजनेत युरोप, चीन या...

कर्जमाफी योजनेतील ३ हजार ८१२ शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाने २ जून आणि १५ जुलै २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ जाहीर केली आहे.या योजनेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!