Wednesday, July 29, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाच दिली नाही म्हणून चक्क अर्जदाराचाच बनवला मृत्यूचा दाखला... - जिल्हाधिकाऱ्यांनी दखल...

लाच दिली नाही म्हणून चक्क अर्जदाराचाच बनवला मृत्यूचा दाखला… – जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत ग्रामसेवकास केले निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कर्मचारी किती खालच्या स्तरापर्यंत जाऊ शकतो,याची प्रचिती उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्याच्या अटवा गावात उघडकीस आले आहे.अटवा येथील रहिवासी विश्वनाथ यांच्या पत्नी शांती देवीचे १९ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले. विश्वनाथ आपल्या पत्नीच्या मृत्यू प्रमाणपत्राकरिता ग्रामपंचायत सचिव(ग्रामसेवक) सरिता देवी यांच्याकडे गेले होते.सुरुवातीला सरिता देवी मृत्युपत्र देण्याकरिता चालढकल करीत होत्या.नंतर त्यांनी मृत्यू प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी विश्वनाथकडे २ हजार रुपयांची मागणी केली.ही मागणी करताच विश्वनाथ यांनी लाच देण्यास नकार दिला व प्रमाणपत्र देण्याची मागणी केली.विश्वनाथ यांनी लाच न देण्याच्या भूमिकेमुळे सचिवांनी त्यांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या वारंवार चक्रा मारायला लावल्या.अखेर ३ जानेवारी २०२५ रोजी ग्रामपंचायत सचिवांनी त्यांना मृत्यू प्रमाणपत्र बनवून दिले.विश्वनाथ यांनी ते प्रमाणप्रत्र पाहिले तेव्हा त्यावर पत्नी शांती देवी नावा ऐवजी त्यांचे स्वत:चे नाव त्यावर होते.हे पाहताच विश्वनाथ यांना धक्का बसला. लाच देण्यास नकार दिल्याने हा प्रकार सचिवांनी त्यांच्यासोबत केल्याचे विश्वनाथ यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकाराची हरदोई जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मंगला प्रसाद सिंह यांच्याकडे यासंबंधी तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण समजून घेत तात्काळ कारवाई करीत सरिता देवी यांना निलंबित केले. त्यांच्याविरुद्ध एफआयआर(FIR) दाखल करण्यात आला व त्याचवेळी बीडियो(संवर्ग गट विकास अधिकारी) यांनी स्वत: विश्वनाथ यांच्या घरी जाऊन शांती देवीचे मृत्यू प्रमाणपत्र दिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!