Friday, September 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यामध्ये ३ टक्क्यांची वाढ..

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यामध्ये ३ टक्क्यांची वाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यामध्ये ३ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.या संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने आज,मंगळवार २५ फेब्रुवारी २०२५ रोजी एक शासन निर्णय जारी केला असून,या निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात १ जुलै २०२४ पासून सुधारण करण्यात आली आहे.या सुधारणेनुसार महागाई भत्त्याचा दर ५० टक्क्यांवरून ५३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.हा वाढीव महागाई भत्ता १ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आला असल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ ने दिले आहे.राज्य शासनाच्या या निर्णयानुसार हा वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात दिला जाणार आहे.अर्थात १ जुलै २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या सात महिन्यांचा वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी २०२५ च्या वेतनात थकबाकी म्हणून दिला जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!