उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील रखडलेल्या २९ महापालिका,२४७ नगरपालिका,१४७ नगर पंचायती,३४ जिल्हा परिषद आणि ३५१ पंचायत समितीच्या निवडणुका पुढील वर्षी ३१ जानेवारीच्या आत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने १६ सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची लेखी प्रत अद्याप आयोगाला प्राप्त झालेली नाही.तथापि,न्यायालयाचे निर्देश लक्षात घेता आयोगाकडून तीन टप्प्यांत निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे.राज्यात पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील. दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाईल,तर शेवटच्या टप्प्यात २९ महापालिकांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. निवडणूक कार्यक्रमाची माहिती आयोगाकडून राज्य सरकारला दिली जाईल.तीन टप्प्यातील निवडणुकांमुळे राज्यात नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान निवडणूक आचारसंहिता लागू राहण्याची शक्यता आहे.अर्थात ही निवडणूक आचारसंहिता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रापुरती लागू असणार आहे.पण,तरीही त्याचा परिणाम नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर होण्याची चिन्हे आहेत.काही भागातील आचारसंहितेमुळे अधिवेशनात सरकारला फार मोठ्या लोकप्रिय घोषणा करता येणार नाहीत.विशेष म्हणजे,नागपूरचे हिवाळी अधिवेशन येत्या ८ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनातील घोषणांचा पाऊस थांबण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
राज्यातील निवडणुका होणार लागोपाठ; हिवाळी अधिवेशनातील घोषणांचा पाऊस थांबणार..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

