- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यात २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगर पंचायतीमध्ये येत्या,मंगळवार २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा,यासाठी २ डिसेंबरला अधिकृत सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.निवडणूक असलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये सदरचा आदेश लागू राहणार आहे.मतदारांना कोणत्याही अडथळ्याशिवाय मतदान करता यावे,यासाठी सरकारने ही महत्त्वाची घोषणा केली आहे.शुक्रवारी जारी झालेल्या शासकीय निर्णयानुसार,ज्या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी मतदान होईल,त्या ठिकाणच्या सर्व कर्मचाऱ्यांना सवेतन सुट्टीचा हक्क प्राप्त असेल.मागील निवडणुकांत काही विभागांनी सवेतन सुट्टी न दिल्याने अनेक कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले होते. जनप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ नुसार मतदानाच्या दिवशी सवेतन सुट्टी देणे बंधनकारक आहे,याचीही आठवण सरकारी आदेशात करून देण्यात आली आहे.मतदान क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व श्रमिक, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर हा नियम लागू होणार आहे,मग त्यांचे कार्यस्थळ मतदान क्षेत्रात असो वा बाहेर असो.उद्योग,हॉटेल,दुकाने,आयटी कंपन्या,मॉल,किरकोळ व्यवसाय यांसह श्रम विभागाच्या अखत्यारीतील सर्व प्रतिष्ठानांनी या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. जर कोणत्या संस्थेला दिवसभर सुट्टी देणे शक्य नसेल तर किमान २ ते ३ तासांची खास सुट्टी देणे बंधनकारक असेल.नियमांचे पालन न केल्यास संबंधित संस्थांवर कारवाई करण्यात येईल,असा इशारा सरकारने दिला आहे.
- Advertisement -

