उद्रेक न्युज वृत्त :-दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस नक्षल चकमकीत १५ नक्षली ठार करण्यात आले असून यात एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला जयराम ऊर्फ चलपतीही मारला गेला आहे.रविवारी रात्रीपासून ते आज मंगळवारच्या सकाळपर्यंत अधूनमधून गोळीबार सुरू आहे.सदरची कारवाई छत्तीसगड आणि ओडिशा पथकाद्वारे करण्यात आली.यात १० संघ एकत्र येत ओडिशातील ३ पथके, छत्तीसगड पोलिसांचे २ पथके आणि सीआरपीएफची ५ पथके या कारवाईत सहभागी होती.जवान परिसरात शोध मोहिमेवर असतांना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.गारियाबंदचे एसपी निखिल राखेचा,ओडिशाचे नुआपाडा एसपी राघवेंद्र गुंडाला, ओडिशाचे डीआयजी नक्षल ऑपरेशन अखिलेश्वर सिंह आणि कोब्रा कमांडंट डीएस कथैत यावर देखरेख करीत आहेत.चकमकीची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारीही मैनपूरला पोहोचले.सुरक्षेच्या कारणास्तव भातीगढ स्टेडियमचे छावणीत रूपांतर करण्यात आले.परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते.त्याचवेळी ३ आयईडीही जप्त करण्यात आले.कुऱ्हाडी घाटातील भालू दिग्गी जंगलात १ हजार जवानांनी सुमारे ६० नक्षलवाद्यांना घेरले आहे.त्यामुळे नक्षली मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मोठी बातमी चकमकीत १५ नक्षली ठार; अधूनमधून चकमक सुरूच..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

