- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-गाव खेड्यांमध्ये शेळ्या,बकऱ्या व इतर पशुंसाठी गावनजिक परिसरातील चारा म्हणजेच झाडाच्या डारा तोडून आणल्या जातात वा गुराखी गुरे चराईसाठी जंगल परिसरात नेत असतात.अशातच शहरी भागात अश्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्याने परिसरातीलच वृक्षाचा पाला तोडत असतात.अशातच एक १५ वर्षीय बालक बकरीसाठी चारा तोडण्यासाठी झाडावर चढला असता बालकाचा विजेच्या तारांशी संपर्क आल्यामुळे झाडावरच चिकटूनच राहिला आणि त्याचा मृत्यू झाल्याची घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ऑटोमोटिव्ह चौकाजवळील पंतप्रधान आवास योजना इमारतीजवळ सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.हिदायतुल्ला हामिद हुसैन शेख वय १५ वर्षे,रा.लाल झेंडा चौक,नागपूर असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.हिदायतुल्ला शेख सकाळी बकऱ्यांना चारा तोडण्यासाठी तोडण्यासाठी झाडावर चढला.या झाडाला लागूनच विजेच्या तारा होत्या.झाडाची डार तोडत असतांना तो विजेच्या तारांच्या संपर्कात आला.त्याला विजेचा तीव्र धक्का लागला आणि झाडावरच त्याचा मृत्यू होऊन तो तेथेच अडकला.घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अग्निशमन दल आणि वीज कर्मचाऱ्यांना बोलावले.त्यानंतर बालकाला झाडावरून खाली उतरवून उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.बालकाचे वडील हामिद हुसैन शेख यांच्या सूचनेवरून यशोधरानगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
- Advertisement -

