Friday, August 7, 2026
Homeनागपूरबँक अध्यक्षपदाच्या अपात्रता प्रकरणी बच्चू कडूंना दिलासा.. - मुंबई उच्च न्यायालयाच्या...

बँक अध्यक्षपदाच्या अपात्रता प्रकरणी बच्चू कडूंना दिलासा.. – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह विविध १७ मागण्यांसाठी ८ जून २०२५ पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.विरोधी पक्षातील नेत्यांसह विविध संघटनांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता.त्यानुसार  आंदोलनाची महायुती सरकारने दखल घेत बच्चू कडू यांना लेखी आश्वासन दिल्याने शनिवार १४ जून रोजी अन्नत्याग आंदोलन आणि चक्का जाम आंदोलन स्थगित करीत करण्यात आले होते.आंदोलन स्थगित करताच बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून १६ जून रोजी अपात्र ठरविण्यात आले होते.बच्चू कडू यांच्याविरुद्ध २०१७ मध्ये नाशिक येथील एका आंदोलनप्रकरणात सुकरवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.शासकीय कामात अडथळा आणि मारहाण केल्यावरून न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियमानुसार,बँकेच्या संचालकाला न्यायालयाने एक वर्षापर्यंतची शिक्षा सुनावल्यास त्याला पदावर राहता येत नाही.हीच बाब पुढे करीत बँकेच्या विरोधी गटातील बारा संचालकांनी हरिभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वाखाली बच्चू कडू यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती.सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी या तक्रारीची दखल घेत बच्चू कडू यांना नोटीस बजावली होती.यानंतर बच्चू कडू यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले होते.याआधारे सहनिबंधकांनी त्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय घेतला होता.शिवाय त्यांना पाच वर्षांपर्यंत बँकेची कोणतीही निवडणूक लढता येणार नव्हती.याविरुद्ध बच्चू कडू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. यावर आज,मंगळवार २४ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. सुनावणीत न्यायालयाने विभागीय सहनिबंधकांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.यामुळे बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे.न्यायालयाने अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून दिलेला निर्णय हा सत्याचा विजय आहे,अशा शब्दांत बच्चू कडू यांनी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!