- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-प्रेमविरांनी घरून पळून जाण्याचा बेत आखला आणि ट्रेनचा सफर करू लागले.अश्यातच नेहमी नजरेसमोर दिसणारी आपली मुले कुठे गेलीत,या टेन्शनमध्ये आई-वडिलांनी खाणे पिणे सोडून दिले.शोध घेऊनही थांगपत्ता लागेनासा झाला.महत्वाचे म्हणजे, सर्वात जास्त काळजी ही मुलीकडील पित्यांनाच असते.त्यामुळे मुलीकडील कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.त्यानुसार यंत्रणा कामाला लागली आणि दोघेही प्रेमवीर ट्रेनचा सफर करीत ‘हम तो चले परदेस,हम परदेसी हो गये’ असे करीत ट्रेनच्या जनरल कोचमध्ये सापडले.तरुणी ही नागपूरच्या कळमन्यातील डिप्टी सिग्नल भागातील आहे.तर युवक हा नागपूरच्या शांतीनगरातील रहिवासी आहे.युवकाने युवतीला प्रेमजाळ्यात ओढले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिला दोन दिवसांपूर्वी गुरुवारी ३ जुलैला घरून बोलवून घेतले.त्यानंतर दोघांनीही नागपूरच्या रेल्वे स्थानकावरून ट्रेन पकडली.ट्रेन नंबर १८२४० इतवारी-बिलासपूर-शिवनाथ एक्स्प्रेसमध्ये बसून दोघेही छत्तीसगडकडे निघाले.दरम्यान,मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर कळमना पोलिसांनी स्थानिक रेल्वे पोलिस तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना माहिती दिली. त्यानुसार,आरपीएफचे उपनिरीक्षक मोहम्मद मुगीसुद्दीन आपल्या दोन सहकाऱ्यांसह शिवनाथ एक्स्प्रेसमध्ये गस्त करतांना नमूद वर्णनाच्या मुला-मुलीचा शोध घेत होते.त्यांना ट्रेनच्या जनरल कोचमध्ये हे दोघेही दिसताच ताब्यात घेतले.प्राथमिक चौकशीत पळून गेलेले आणि कळमना ठाण्यात नोंद असलेले हे दोघे तेच असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रेमविरांना राजनांदगाव (छत्तीसगड) आरपीएफच्या हवाली करण्यात आले.पुढील प्रक्रिया पार पाडून दोघांनाही कुटुंबीयांकडे हवाली करण्यात आले.
- Advertisement -

