Tuesday, July 21, 2026
Homeब्रम्हपुरीप्रशासन सुस्त; रेती तस्कर मस्त..!- ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक रेती घाट अवैध तस्करांच्या...

प्रशासन सुस्त; रेती तस्कर मस्त..!- ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक रेती घाट अवैध तस्करांच्या विळख्यात

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

ब्रह्मपुरी :- तालुक्यातअवैधरीत्या रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणावर केला जात असून काही गावातील नागरिक यावर आळा घालण्यासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करीत असता रेती तस्कर हमारी-तुमरी वर येत असल्याने रेती तस्करीवर आळा घालणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.रेती तस्करांच्या मुजोऱ्या वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे प्रशासन सुस्त तर रेती तस्कर मस्त; अशी परिस्थिती पहावयास मिळत असल्याने तालुक्यातील अनेक रेती घाट अवैध  तस्करांच्या विळख्यात सापडले असल्याचे हल्ली सर्वत्र चित्र दिसून येत आहे.

२७ फेब्रुवारी २०२३ ला पर्यावरण विभागाने शासन आदेश काढत रेतीघाट बंद केले.तरीसुद्धा तालुक्यातील अर्हेर नवरगाव,रणमोचन, खरकाडा, सोंन्द्री, बोढेगाव, बोळधा,हळदा,आवळगाव,चिखल- धोकळा,कोलारी,बेलगाव या नदीपात्रातून रेतीचा विनापरवाना अवैधरीत्या उपसा मोठ्या जोमाने सुरू आहे.मात्र,स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

शहरातून दिवस-रात्र विनापरवाना रेतीची अवैधरीत्या तस्करी होत आहे.स्थानिक गावातील नागरिक रेतीतस्करांना विरोध करीत आहेत; पण वाळू तस्कर अरेरावीची भाषा करीत तक्रार केल्यास धमकी देतात.मात्र,यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

काही नागरिकांनी गुरुवारी अहेर नवरगाव नदीपात्रातून अवैधरीत्या रेतीची तस्करी करणाऱ्या एका टिप्परला अडवून विचारणा केली.त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा वाळू परवाना नसल्याचे समोर येताच त्यांनी ११२ वर कॉल केला पण पोलिस प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. तब्बल दोन तास त्या टिप्परला अडवून ठेवले होते; परंतु कोणतेच अधिकारी,कर्मचारी कारवाईसाठी धजावले नाहीत.

अवैध रेती तस्करीवर प्रशासनाकडून जोपर्यंत कठोर पावले उचलली जाणार नाही.तोपर्यंत सर्वत्र असेच चित्र दिसून येणार असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!