- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ अरबी समुद्रातील एलिफंटाला जाणाऱ्या एका प्रवासी बोटला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्याने प्रवासी बोटचे दोन तुकडे होऊन,बुडून तिघांचा मृत्यू झाला तर एकाचा पाय तुटला असल्याची घटना आज,बुधवार १८ डिसेंबरला दुपारच्या सुमारास घडली.बोटीमध्ये एकूण ८० प्रवासी होते.त्यापैकी ७७ प्रवाश्यांना वाचवण्यात यश आले आहे.नीलकमल नावाची प्रवासी बोट नेहमीप्रमाणे आज बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून एलिफंटा लेण्यांकडे जाण्यासाठी निघाली होती.या बोटीमध्ये ८० प्रवासी होते.फेरीबोट १० किलोमीटर अंतरावर समुद्रात गेल्यानंतर नौदलाची एक स्पीड बोट त्याठिकाणी आली.सुरुवातीला नौदलाच्या बोटीने प्रवासी बोटला चक्कर मारून निघून गेली.त्यानंतर
प्रवासी बोटपासून काही अंतरावर नागमोडी वळण घेत गेली.परंतु,नौदलाची बोट परत वेगाने प्रवासी बोटीकडे आली आणि मधोमध जोराची धडक दिली.बोटीची धडक जोरात बसल्याने प्रवासी बोटीचे मधोमध दोन तुकडे झाले आणि प्रवासी पाण्यात पडले.नौदलाच्या स्पीड बोटमध्ये एकूण ६ जण होते. बोट नौदलाची असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय नौदलकडून चौकशी सुरू झाली आहे.
- Advertisement -

