- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-एखादेवेळी पोलीस-नक्षल चकमकीत निष्पाप लोकं जिव गमावून बसतात.त्यामुळे अश्या परिस्थितीत चकमक सुरू असतांना घटनेतील मृत्युच्या कारणांचा शोध लावणे आवश्यक असल्याने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता,२०२३ चे कलम १९६ अन्वये दंडाधिकारी चौकशी करण्यात येते.त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस स्टेशन कोठी,उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या कोपर्शी जंगल परिसरात २१ ऑक्टोंबर २०२४ रोजी पोलीस-नक्षल चकमक झाली होती. चकमकी दरम्यान,दोन पुरुष व तीन महिलांचे मृतदेह आढळले होते.त्यामुळे या घटनेतील मृत्युच्या कारणांचा शोध लावण्याकरिता दंडाधिकारी चौकशी करण्यात येणार आहे.त्यामुळे सदर घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छीणाऱ्यांनी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभगीय दंडाधिकारी,एटापल्ली यांच्याकडे १५ दिवसाचे आत किंवा तत्पूर्वी सादर करावे; असे आवाहन उपविभागीय अधिकारी नमन गोयल यांनी केले आहे.
- Advertisement -

