उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच महिन्यांपासून छत्तीसगडच्या काही जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी उपद्रव माजविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे; अशातच अनुचित घटना घडण्यापूर्विच सुक्षा दल यांचेकडून चोख प्रत्युत्तर दिला जात असल्याने नक्षिली कृत्या थंडावल्याचे दिसून येत आहे.त्यातच आज,शनिवार १ फेब्रुवारीला छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील गंगालूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चमकमकीत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.गांगलूर परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे, डीआरजी,एसटीएफ, कोब्रा २०२ आणि सीआरपीएफ २२२ बटालियनच्या जवानांच्या संयुक्त पथकाने शोध मोहिमेवर विजापूर येथून बाहेर काढले.आज शनिवारी सकाळी सैनिक त्या भागात पोहोचले,तेव्हा नक्षलवाद्यांनी सैनिकांना पाहिले आणि गोळीबार सुरू केला.त्यातच आठ नक्षलींनी कंठस्नान घातले असून चकमक अजूनही सुरू असल्याने ठार झालेल्या नक्षलींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पोलीस-नक्षल चकमक; ८ नक्षलवाद्यांचा खात्मा..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

