- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार ३० जून पासून मुंबईत सुरू होते.पावसाळी अधिवेशनाचा आज,शुक्रवार १८ जुलै रोजी शेवटचा दिवस होता.तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांत विधानभवनाच्या परिसरात काल गुरुवारी जोरदार हाणामारी झाली.त्याचे तीव्र पडसाद आज सभागृहात उमटले.विरोधकांनी या मुद्यावरून टीकेची झोड उठवत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.पण सरकारने तेवढ्याच शिताफीने त्यांचा डाव उधळवून लावला. दरम्यान,आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली.आता राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ८ डिसेंबर २०२५ रोजी नागपुरात होणार असून याबाबत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत,तर विधानपरिष सभापती प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेत घोषणा केली.अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांचा अपमान व इतर मुद्दे उपस्थित करून सभागृह चांगलेच गाजवले होते.काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मोदी तुमचा बाप असेल,शेतकऱ्यांचा नाही,असे म्हणीत सभागृहात खडाजंगी केल्याने त्यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले होते.परत दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात काहीकाळ गदारोळ उठला होता.अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे अनेक सवाल उपस्थित करत आपल्याच सरकारला धारेवर धरतांना आढळून आले.मात्र,पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या एक दिवसापूर्वी लोकशाहीचे मंदिर असलेल्या विधिमंडळास गालबोट लागले.हे विशेष.
- Advertisement -

