- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-संसाराचा गाडा हाकतांना पतीसोबत तिचे वारंवार खटके उडायचे.संसारातील कलह इतका वाढला की,सततच्या भांडणांमुळे पत्नी मनातून खचली.पती-पत्नीचे पटत नसल्याने महिनाभरापूर्वीच ती आपल्या माहेरी परतली होती.माहेरी आल्यानंतरही तिच्या मनातील अस्वस्थता कायम होती.एकांतवासात तिने पुन्हा एकदा आपला संसार सावरण्याचा प्रयत्न केला. पतीला वारंवार फोन लावले,मनातील संवाद साधू इच्छिणाऱ्या मैत्रिणींनाही संपर्क केला.मात्र,पतीने एकही कॉल उचलला नाही.कोणाशीही संवाद न झाल्याने आणि पतीने प्रतिसाद न दिल्याने उदासीन झालेल्या पत्नीने आत्महत्येचा निर्णय घेतला.तत्पूर्वी तिने एक हृदयस्पर्शी चिठ्ठी लिहिली,ज्यात तिने ‘आय लव्ह यू संदीप’ म्हणत आपल्या प्रेमाची साक्ष दिली आणि पतीच्या वागण्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे स्पष्ट करून राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.मयुरी संदीप मेंढे वय ३४ वर्षे,(माहेरचे नाव मयुरी राष्ट्रपाल मानवटकर, रा.महादुला (कोराडी),ता.कामठी,जि.नागपूर असे मृत पावलेल्या विवाहितेचे नाव असून मयुरीचा विवाह काही वर्षापूर्वी वर्धा येथील संदीप शालिक मेंढे यांच्याशी झाला होता. दोन दिवसांपूर्वी महादुला येथील बौद्ध विहारात कार्यक्रम असल्याने घरातील सर्व मंडळी तिथे गेली होती. मयुरी घरी एकटीच होती.रात्री घरची मंडळी परतल्यावर दरवाजा आतून बंद होता.अखेर दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता,मयुरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.मयुरीच्या आत्महत्येमुळे तिचे माहेरचे कुटुंब हादरले आहे.मयुरीला पतीकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता,त्यामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले,असा थेट आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.पोलिसांनी घटनास्थळावरून ती चिठ्ठी जप्त केली असून,मयुरीचा भाऊ सुहास याच्या तक्रारीनंतर कोराडी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
- Advertisement -

