- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नक्षलवाद जो पर्यंत संपुष्टात येणार नाही,तोपर्यंत शांत बसणार नाही.देशातून नक्षलवाद्यांचा पूर्णपणे नायनाट करणे,हे सरकारचे ध्येय आहे.या दिशेने केंद्र आणि राज्य सरकार वेगाने काम करत आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की,पूर्वी नक्षलवादी पावसाचा फायदा घेऊन जंगलात लपून बसायचे,परंतु आता असे होणार नाही. नक्षलवाद्यांना पावसाळ्यातही शांत झोपू दिले जाणार नाही.नक्षलवादाविरुद्धची कारवाई पावसातही सुरुच राहील.ही कारवाई कोणत्याही हवामानावर अवलंबून राहणार नाही.आमचे सुरक्षा दल पूर्ण ताकदीने काम करत आहेत आणि ही लढाई निर्णायक वळणावर पोहोचली आहे.त्यांनी स्पष्टपणे सांगितले की नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवत आत्मसमर्पण करावे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातून नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंतची तारीख निश्चित केली आहे.या दिशेने नक्षलग्रस्त भागात तीव्र मोहिमा राबवल्या जात आहेत. छत्तीसगडमधील एका कार्यक्रमात बोलतांना शाह म्हणाले की,नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून देशाच्या विकास प्रवासात भागीदार व्हावे.ज्यामुळे मुख्य प्रवाहात परतणाऱ्यांना चांगले भविष्य आणि सन्माननीय जीवन जगण्याची संधी मिळेल.अन्यथा समूळ उच्चाटन केल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
- Advertisement -

