Friday, April 17, 2026
Homeनागपूरदोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा आढळला मृतदेह..!

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा आढळला मृतदेह..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा अखेर मृतदेह आढळून आल्याने कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.तरुणाने पत्नीला घरी सोडून बाहेरून येतो म्हणाला तो घरी परतलाच नाही.त्याची दुचाकी वर्धा जिल्ह्याच्या राहटी शिवारात तर मृतदेह नागपूरच्या कोंढाळीलगतच्या शिरमी शिवारातील जंगलात काल शुक्रवारी आढळून आला.शरीरावरील जखमांमुळे त्याची अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.या प्रकरणात पोलिसांनी चौकशीसाठी चौघांना ताब्यात घेतले असून,त्यात एका महिलेचा समावेश आहे.चौघेही कोंढाळी येथील रहिवासी आहेत.मख्खनसिंग रणजीत सिंग बावरी वय ३८ वर्षे,रा.विकासनगर,कोंढाळी,ता. काटोल,जि.नागपूर असे मृताचे नाव आहे.तो पत्नीसह बुधवारी ३० जुलै रोजी कोंढाळी येथील आठवडी बाजारात गेला होता.रात्री ८ वाजताच्या सुमारास त्याने पत्नीला घरी सोडून दिले आणि पुन्हा मोटारसायकलने बाजारात गेला.तो रात्री घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याच्या मोबाइल फोनवर वारंवार संपर्क साधला. संपर्क होत नसल्याने त्यांनी त्याच्या मित्रांच्या मदतीने त्याचा शोध घेणे सुरू केले.त्याची मोटारसायकल वर्धा जिल्ह्यात आढळून आल्याने कुटुंबीयांनी गुरुवारी तो बेपत्ता असल्याची कोंढाळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.त्याअनुषंगाने ठाणेदार राजकुमार त्रिपाठी व पोलिस उपनिरीक्षक धवल देशमुख यांनी कोंढाळी येथील महत्त्वाच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.त्यातील एका फुटेजमध्ये तो बुधवारी रात्री ८:४१ वाजताच्या सुमारास तो दोन अनोळखी व्यक्तींसोबत मोटारसायकलवर बसून जात असल्याचे निदर्शनास आले.त्यातच काल शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला.पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविला. अप्पर पोलिस अधीक्षक अनिल मस्के व उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांनी घटनास्थळाची पाहणी केली.याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! कासवांची तस्करी करणाऱ्यांकडून धक्कादायक बाबी उघड.. – अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपक्षेत्राच्या नियतक्षेत्र शिर्शी बिटातील चिचडोह बॅरेजवरून हरंबा गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर कासवाची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची...

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!