- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा अखेर मृतदेह आढळून आल्याने कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.तरुणाने पत्नीला घरी सोडून बाहेरून येतो म्हणाला तो घरी परतलाच नाही.त्याची दुचाकी वर्धा जिल्ह्याच्या राहटी शिवारात तर मृतदेह नागपूरच्या कोंढाळीलगतच्या शिरमी शिवारातील जंगलात काल शुक्रवारी आढळून आला.शरीरावरील जखमांमुळे त्याची अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.या प्रकरणात पोलिसांनी चौकशीसाठी चौघांना ताब्यात घेतले असून,त्यात एका महिलेचा समावेश आहे.चौघेही कोंढाळी येथील रहिवासी आहेत.मख्खनसिंग रणजीत सिंग बावरी वय ३८ वर्षे,रा.विकासनगर,कोंढाळी,ता. काटोल,जि.नागपूर असे मृताचे नाव आहे.तो पत्नीसह बुधवारी ३० जुलै रोजी कोंढाळी येथील आठवडी बाजारात गेला होता.रात्री ८ वाजताच्या सुमारास त्याने पत्नीला घरी सोडून दिले आणि पुन्हा मोटारसायकलने बाजारात गेला.तो रात्री घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याच्या मोबाइल फोनवर वारंवार संपर्क साधला. संपर्क होत नसल्याने त्यांनी त्याच्या मित्रांच्या मदतीने त्याचा शोध घेणे सुरू केले.त्याची मोटारसायकल वर्धा जिल्ह्यात आढळून आल्याने कुटुंबीयांनी गुरुवारी तो बेपत्ता असल्याची कोंढाळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.त्याअनुषंगाने ठाणेदार राजकुमार त्रिपाठी व पोलिस उपनिरीक्षक धवल देशमुख यांनी कोंढाळी येथील महत्त्वाच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.त्यातील एका फुटेजमध्ये तो बुधवारी रात्री ८:४१ वाजताच्या सुमारास तो दोन अनोळखी व्यक्तींसोबत मोटारसायकलवर बसून जात असल्याचे निदर्शनास आले.त्यातच काल शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला.पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविला. अप्पर पोलिस अधीक्षक अनिल मस्के व उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांनी घटनास्थळाची पाहणी केली.याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
- Advertisement -

