Wednesday, April 15, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज येथे शिवरायांच्या पुतळा अवमानना विरोधात निषेध मोर्चा..

देसाईगंज येथे शिवरायांच्या पुतळा अवमानना विरोधात निषेध मोर्चा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली):-मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या शिवरायांच्या अवमानना विरोधात आज, सोमवार दिनांक-९ सप्टेंबरला छत्रपती शिवाजी क्लबचे अध्यक्ष सागर वाढई यांच्या नेतृत्वात देसाईगंज उपविभागीय कार्यालय या ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आला.यावेळी ‘जाहीर निषेध’ या बॅनरखाली शिवप्रेमींनी शिव गर्जना करीत सरकारच्या विरोधात घोषणा देत घटनेचा निषेध करण्यात आला.या मोर्चामध्ये राजकीय पक्षाचे पदाधिकारी,सामाजिक संघटना तसेच विविध कार्यकर्ते सहभागी झाले होते.

देसाईगंज शहरातून सरळ उपविभागीय कार्यालय या ठिकाणी शिवप्रेमी गोळा होत निषेध मोर्चा काढण्यात आला.शिवप्रेमींनी हातात निषेध व्यक्त करणारा बॅनर घेऊन “निषेध असो,निषेध असो,शिवद्रोही सरकारचा निषेध असो”, “छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सरकारचा निषेध असो” “मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधकाम मंत्री राजीनामा दो,राजीनामा दो” “छत्रपती शिवरायांचा अवमान खपवून घेतल्या जाणार नाही”, “छत्रपतींच्या सन्मानात,शिवप्रेमी मैदानात” “जय जिजाऊ जय शिवराय” “जय भवानी जय शिवाजी” “छत्रपती शिवाजी महाराज की जय” “शिवस्मारक जमिनीवर झालेच पाहिजे ” शिवद्रोही सरकार होश में आव” अशा गगनभेदी घोषणांनी देसाईगंज उपविभागीय कार्यालय दणाणून गेले होते.
सदर मोर्चाचे नेतृत्व देसाईगंज छत्रपती शिवाजी क्लबचे अध्यक्ष सागर वाढई यांनी केले तर अध्यक्षस्थानी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम होते.थोडक्यात मार्गदर्शन ओबीसी समाज संघटना देसाईगंजचे अध्यक्ष लोकमान्य बर्डे, बौद्ध समाज कोर कमिटी देसाईगंजचे अध्यक्ष प्रकाश सांगोळे,सामाजिक कार्यकर्ते चक्रधर पारधी,कमलेश बारस्कर,अनुज घोसे,निशांत वनमाळी यांनी केले.
यावेळी देसाईगंज तालुका काँग्रेस अध्यक्ष राजू बुल्ले,
परसराम टिकले,नितीन राऊत,अरुण कुंभलवार,विलास बनसोड,शरद राऊत,दूर्वाजी नाईक, महेंद्र खरकाटे, एन.डी.प्रधान,राजू मेश्राम,सुनील सहारे, तेजस नवघरे, जितेंद्र चौधरी,कार्तिक कोसेकर,रेशीम
प्रधान,लंकेश ढोरे,गोपाल डोनाडकर,आशुतोष भरणे, विजय पिल्लेवान,रोशन कवासे,दुशांत वाटगुरे,रजनी आत्राम,वैष्णवी आकरे,लता धांडे व तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजी महाराजांचा पुतळा पडला असला तरी महराजांचे विचार अजूनही जिवंत आहेत.. अश्या समाज कंटकांना आम्ही नक्कीच धडा शिकऊ; असे प्रतिपादन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!