Monday, September 7, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज येथे शिवरायांच्या पुतळा अवमानना विरोधात निषेध मोर्चा..

देसाईगंज येथे शिवरायांच्या पुतळा अवमानना विरोधात निषेध मोर्चा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली):-मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या शिवरायांच्या अवमानना विरोधात आज, सोमवार दिनांक-९ सप्टेंबरला छत्रपती शिवाजी क्लबचे अध्यक्ष सागर वाढई यांच्या नेतृत्वात देसाईगंज उपविभागीय कार्यालय या ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आला.यावेळी ‘जाहीर निषेध’ या बॅनरखाली शिवप्रेमींनी शिव गर्जना करीत सरकारच्या विरोधात घोषणा देत घटनेचा निषेध करण्यात आला.या मोर्चामध्ये राजकीय पक्षाचे पदाधिकारी,सामाजिक संघटना तसेच विविध कार्यकर्ते सहभागी झाले होते.

देसाईगंज शहरातून सरळ उपविभागीय कार्यालय या ठिकाणी शिवप्रेमी गोळा होत निषेध मोर्चा काढण्यात आला.शिवप्रेमींनी हातात निषेध व्यक्त करणारा बॅनर घेऊन “निषेध असो,निषेध असो,शिवद्रोही सरकारचा निषेध असो”, “छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सरकारचा निषेध असो” “मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधकाम मंत्री राजीनामा दो,राजीनामा दो” “छत्रपती शिवरायांचा अवमान खपवून घेतल्या जाणार नाही”, “छत्रपतींच्या सन्मानात,शिवप्रेमी मैदानात” “जय जिजाऊ जय शिवराय” “जय भवानी जय शिवाजी” “छत्रपती शिवाजी महाराज की जय” “शिवस्मारक जमिनीवर झालेच पाहिजे ” शिवद्रोही सरकार होश में आव” अशा गगनभेदी घोषणांनी देसाईगंज उपविभागीय कार्यालय दणाणून गेले होते.
सदर मोर्चाचे नेतृत्व देसाईगंज छत्रपती शिवाजी क्लबचे अध्यक्ष सागर वाढई यांनी केले तर अध्यक्षस्थानी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम होते.थोडक्यात मार्गदर्शन ओबीसी समाज संघटना देसाईगंजचे अध्यक्ष लोकमान्य बर्डे, बौद्ध समाज कोर कमिटी देसाईगंजचे अध्यक्ष प्रकाश सांगोळे,सामाजिक कार्यकर्ते चक्रधर पारधी,कमलेश बारस्कर,अनुज घोसे,निशांत वनमाळी यांनी केले.
यावेळी देसाईगंज तालुका काँग्रेस अध्यक्ष राजू बुल्ले,
परसराम टिकले,नितीन राऊत,अरुण कुंभलवार,विलास बनसोड,शरद राऊत,दूर्वाजी नाईक, महेंद्र खरकाटे, एन.डी.प्रधान,राजू मेश्राम,सुनील सहारे, तेजस नवघरे, जितेंद्र चौधरी,कार्तिक कोसेकर,रेशीम
प्रधान,लंकेश ढोरे,गोपाल डोनाडकर,आशुतोष भरणे, विजय पिल्लेवान,रोशन कवासे,दुशांत वाटगुरे,रजनी आत्राम,वैष्णवी आकरे,लता धांडे व तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजी महाराजांचा पुतळा पडला असला तरी महराजांचे विचार अजूनही जिवंत आहेत.. अश्या समाज कंटकांना आम्ही नक्कीच धडा शिकऊ; असे प्रतिपादन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!