Friday, May 1, 2026
Homeगडचिरोलीदेवेंद्र फडणवीस ठरले अतिदुर्गम,नक्षलप्रभावित भागात जाणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री.. - आज १२...

देवेंद्र फडणवीस ठरले अतिदुर्गम,नक्षलप्रभावित भागात जाणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री.. – आज १२ नक्षल्यांची शस्त्रांसह शरणागती; तर १३ नक्षल्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज,शुक्रवार ६ जून रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतांना थेट महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावात पोहोचले.या अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भागात जाणारे ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले.त्यांच्या उपस्थितीत आज कोट्यवधींचे बक्षीस असलेल्या १२ नक्षलवाद्यांनी शस्त्रांसह शरणागती पत्करली.शस्त्रांसह शरणागती पत्करणारे अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे.यापूर्वी शरणागती पत्करलेल्या १३ पूर्वाश्रमीच्या नक्षल्यांचा आज एक सामूहिक विवाह सोहळाही गडचिरोलीत आयोजित करण्यात आला होता.त्याला हजेरी लावत त्यांनी नवदाम्पत्यांना नवजीवनाच्या शुभेच्छा दिल्या.सायंकाळी त्यांनी सी-६० जवानांचा सत्कार केला आणि त्यांना अत्याधुनिक अशी एके-१०३ शस्त्रे आणि एएसएमआय पिस्तुल,बुलेटप्रुफ जॅकेट्स प्रदान केली. त्यांच्या शौर्याची प्रशंसाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.जिल्हा नियोजन विकास निधीतून १९ चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. त्यातील काही बुलेटप्रुफ वाहने आहेत.त्यांच्या चाव्या त्यांनी आज पोलिस दलाकडे सुपूर्द केल्या.या दौर्‍यात मंत्री आशिष जयस्वाल,आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.मिलिंद नरोटे,पोलिस उपमहानिरीक्षक अंकीत गोयल,जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल आदी मान्यवर उपस्थित होते.
  •       सी-६० जवानांचा सत्कार👇
सी-६० जवानांच्या सत्कार कार्यक्रमात बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,आज कवंडे आऊटपोस्टला मी भेट दिली आणि गावकर्‍यांशी संवाद साधला.आपल्या पोलिस दलाने अवघ्या २४ तासात कवंडे आऊटपोस्टचे निर्माण केले.हे केवळ पोलिस ठाणे नाही,तर शासन प्रशासन जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम आहे.जेथे सुरक्षेची कमतरता होती,तेथे पोलिस ठाणे उघडत शासन-प्रशासन जनतेपर्यंत पोहोचविले जात आहे.गेल्या दोन वर्षांत अशा ६ आऊटपोस्ट तयार केल्या.गेल्या दीड वर्षांत २८ माओवाद्यांना मारले,३१ माओवाद्यांना अटक झाली,तर ४४ लोकांनी आत्मसमर्पण केले.हा एक नवीन रेकॉर्ड आहे.ज्यांच्यावर खूप मोठ्या रकमेची बक्षीसं होती,असेही अनेक आता माओवाद सोडून सामान्य जीवनात परत येत आहेत.आपली ही लढाई आता अंतिम टप्प्यात आहे.कवंडे येथे तर अतिशय कठीण ऑपरेशन्स आपल्या जवानांनी केले.ज्या बेटावर नक्षलवादी लपून बसले होते,ते ठिकाणही मी आज पाहिले.डोके पाण्यात बुडेल,अशा ठिकाणी कसब दाखवून तुम्ही ४ नक्षल्यांना यमसदनी धाडले,हे कौतुकास्पद आहे.मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचा खात्मा करायचा,हे आपले टार्गेट.महाराष्ट्रात ४ वर्षांपासून नक्षल भरती पूर्णपणे थांबली होती.पण, अन्य राज्यातून ती व्हायची.पण,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अतिशय कठोर पाऊले उचलली आणि आता नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर आहे.
आज १२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.त्यांच्यावर १ कोटी रुपयांपेक्षा अधिकचे बक्षीस होते.त्यांनी अत्याधुनिक शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे.त्यांना भारताच्या संविधानाची प्रत आज आपण भेट दिली. लॉईडसारख्या उद्योगांनी पुनर्वसनात मोठा हातभार लावला आहे.हा जिल्हा रोजगारयुक्त करायचा आणि भारताचे पोलाद शहर म्हणून तो विकास करायचा आहे.हे करतांना येथील निसर्गसंपदा,जल,जमीन, जंगल कायम ठेवूनच हा विकास करण्याचा शासनाचा निर्धार आहे.
 
  • नक्षलग्रस्त भागात परिवर्तनाचे वारे; गडचिरोली जिल्हा औद्योगिक केंद्र बनेल👇
छत्तीसगड सीमेलगतच्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त कवंडे भागात आयोजित लाभार्थी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेशी संवाद साधला,तेव्हा ते म्हणाले की गडचिरोलीला नक्षलमुक्त व औद्योगिकदृष्ट्या सक्षम जिल्हा बनवण्याचा आमचा निर्धार आहे.शासन आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून नक्षलग्रस्त भागात परिवर्तनाचे वारे वाहू लागले असून,शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचत असल्यामुळे लोकांमध्ये शासनाबाबतचा विश्वास वाढला आहे.हीच खरी लोकाभिमुख विकास प्रक्रिया आहे.कवंडे,नेलगुंडा आणि पेनगुंडा या ठिकाणी नुकतीच ‘धरती आबा’ अभियानांतर्गत शिबिरे घेण्यात आली.या शिबिरांमध्ये एकूण ५३३ लाभार्थ्यांना विविध योजनांचे ९८७ लाभ वितरित करण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आयुष्मान भारत,प्रधानमंत्री आवास योजना,अन्न सुरक्षा योजना, पीएम किसान सन्मान निधी,मनरेगा जॉब कार्ड, स्क्रिनिंग व अ‍ॅनिमिया तपासणी,आधार अद्ययावत करणे,जात प्रमाणपत्र आदी योजनांचे लाभ वितरित करण्यात आले.महसूल,आरोग्य, कृषी, सामाजिक न्याय,पंचायत राज,महिला व बालकल्याण, वन विभाग,पोलिस आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते.
  • महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याला जोडणार्‍या पुलाची ड्रोनद्वारे पाहणी👇
नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील पूल एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरणार आहे.दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटी सुधारून विकासाची गंगा पोहोचवणे,हा शासनाचा दृढ निर्धार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.ड्रोनच्या मदतीने त्यांनी या पुलाची पाहणी केली.
राज्यमार्ग ३८० वरील १०० मीटर रुंद कोरमा नाल्यावर सध्या १२० मीटर लांबीचा पूल उभारण्यात येत असून,यामुळे महाराष्ट्र व छत्तीसगड या दोन राज्यांतील थेट दळणवळण शक्य होणार आहे.या प्रकल्पासाठी १० कोटी ७० लाख रुपयांची तांत्रिक मान्यता प्राप्त असून,हा पूल लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक विभागाला दिले.या पुलाच्या निर्माणामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील गावांनाही सुकर दळणवळणाची सुविधा प्राप्त होणार असून,प्रशासनाच्या सेवा व विकास कार्यक्रम प्रभावीपणे पोहोचण्यास मोठी मदत होईल,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!