- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-जम्मू-काश्मीरच्या पहलगामपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ बैसरन व्हॅली येथे मंगळवारी २२ एप्रिलला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बैसरन मैदानावर सैनिकी गणवेशात येत दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे आणि धर्म विचारत शिवीगाळ केली आणि घोडेस्वारीचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला.झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.यात महाराष्ट्रातील ६ जण मृत्यूमुखी पडलेत.डोंबिवलीतील ३,पुण्यातील २ व पनवेल येथील एकाचा समावेश आहे.बैसरन व्हॅली हे पहलगामपासून काही किलोमीटर अंतरावर असलेले प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.या ठिकाणी फक्त घोड्याने किंवा पायीच जाता येते.दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक आनंद लुटण्यासाठी भेट देत असतात.गोळीबाराची घटना अशावेळी घडली,ज्यावेळी पर्यटक मोठ्या प्रमाणात होते.अशातच आता दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांना ५० लाखांची आर्थिक मदत राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज,मंगळवार २९ एप्रिलला राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. त्यानुसार बैठकीत पहलगाम हल्ल्यातील मृतांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच पीडित कुटुंबातील व्यक्तींची रोजगार आणि शिक्षणाची जबाबदारी देखील राज्य सरकारच्या वतीने उचलण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पीडित जगदाळे कुटुंबातील आसावरी जगदाळे हिला नोकरी देण्याचा निर्णय देखील राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे.या बरोबरच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील मृत झालेल्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे विविध मंत्री देखील उपस्थित होते.
- Advertisement -

