Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरएकाच शिक्षकाची दोन शाळांत दाखवली नियुक्ती... -शिक्षक भरती घोटाळा प्रकरण

एकाच शिक्षकाची दोन शाळांत दाखवली नियुक्ती… -शिक्षक भरती घोटाळा प्रकरण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शिक्षक भरती घोटाळा,शालार्थ आयडी भ्रष्टाचार प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.यात पुन्हा एक प्रकरण पुढे आले आहे.एकाच शिक्षकाची दोन शाळांत नियुक्ती दाखविण्यात आली असून सदरची माहिती शाळांनीच आपल्या अहवालात शिक्षणाधिकाऱ्यांना दिली आहे.शिक्षण संचालनालय पुणे यांनी शिक्षणाधिकाऱ्याच्या माध्यमातून २०१९ ते २०२५ या काळात नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा अहवाल मागितला होता. शिक्षणाधिकाऱ्यांनी ३०४ शाळांना पत्र पाठवून २२ मुद्यांवर माहिती मागितली होती.या २२ मुद्यांमध्ये बहुतांश मुद्दे शिक्षकांच्या अप्रूव्हल,नियुक्तीचा दिनांक, शालार्थ आयडीचा प्रस्ताव व दिलेल्या मंजुरीसंदर्भातील होते.या अहवालात २०१९ ते २०२४ या काळात शाळांनी दिलेल्या अहवालानुसार,१०५८ शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्त्या झाल्याचे दिसून येतेय.यामध्ये एक शिक्षक अर्चना प्रायमरी स्कूल जम्मूदीपनगर व जयमाता अपर प्रा.स्कूल डायमंडनगर दोन्ही शाळांत नियुक्त आहे.यासंदर्भात विदर्भमाध्यमिक शिक्षक संघटनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे.यासंदर्भात शिक्षण विभागाने खुलासा करावा,अशी मागणी संघटनेचे अविनाश बढे यांनी केली आहे.
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.जवळपास ५८० बोगस शालार्थ आयडी शिक्षण विभागाच्या सिस्टीममध्ये जनरेट झाल्याचे पुढे आले आहे.विशेष म्हणजे या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून अस्तित्वात नसलेल्या शाळांतील शिक्षकांचाही शालार्थ आयडी बनवून वेतन उचलण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे.त्यामुळे हा घोटाळा २०१९ पासून नव्हे तर त्याआधीपासून सुरू असल्याचे समजते.या प्रक्रियेत,बनावट कागदपत्रे आणि चुकीच्या माहितीद्वारे शालार्थ आयडी तयार करून काही शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी वेतन मिळविले आहे. वास्तविक नियुक्त झालेल्या शिक्षकाला शालार्थ आयडी मिळवण्यासाठी,शाळेने शालार्थ पोर्टलवर नोंदणी करणे, शिक्षकाची माहिती आणि कागदपत्रे भरणे आवश्यक आहे.एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शिक्षकाला शालार्थ आयडी मिळतो.त्याचा वापर वेतन आणि इतर कामांसाठी केला जाऊ शकतो.परंतु गत काळात अस्तित्वात नसलेल्या शाळांची नोंद शालार्थ पोर्टलवर कशी करण्यात आली,असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!