Friday, May 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदमदार पावसाची महाराष्ट्राला अजूनहीप्रतिक्षाच....विभागनिहाय पावसाची आकडेवारी…

दमदार पावसाची महाराष्ट्राला अजूनहीप्रतिक्षाच….विभागनिहाय पावसाची आकडेवारी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- राज्यात उशिराने दाखल झालेल्या पावसामुळे प्रकल्प तुडूंब भरतील असे वाटत होते. पण सध्या राज्यातील जलसाठा ६३.४८ टक्क्यांवरच असून मागील वर्षीच्या तुलनेत ही २० टक्के तूट आहे. मध्य महाराष्ट्रात २१, मराठवाड्यात १८,तर विदर्भात ९ टक्के तुटीचा पाऊस झाला.उरलेल्या पावसाळ्यात दमदार पावसाची आस कायम आहे.मात्र मराठवाडा विभागाची स्थिती गंभीर मानली जात आहे.

राज्यात मान्सून आगमनानंतर वाटचाल चांगली झाली.पण अद्यापही धरणातील जलसाठा पुरेसा झालेला नाही.राज्यातील धरणक्षेत्र अजूनही कोरडेच आहे.जुनअखेर ते जुलै मध्यात आणि अखेरीस महाराष्ट्रात धो-धो बरसलेल्या पावसामुळे कुठे दरडी कोसळल्या तरी कुठे महापूर आले.यामध्ये नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. मात्र, त्यानंतर दडी मारलेला पाऊस पुन्हा परतत नसल्याने राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

राज्यातील मोठे,मध्यम आणि लघु प्रकल्पांतील जलसाठ्याची स्थिती बघितली असता या प्रकल्पातील जलसाठा हा केवळ ६३.४८ टक्क्यांवर असून,मागील वर्षी तो याच तारखेला ८३.३४ टक्के होता.यंदा प्रकल्पात २० टक्के तूट असल्याचे दिसत आहे. त्यामुळे धो-धो बरसलेल्या पावसानंतरही राज्यातील प्रकल्प ‘साठी’च गाठू शकल्याचे चित्र आहे.कोकण विभागात ९ टक्के जादा पाऊस झाल्याचे दिसत असून उर्वरित विभागात तुटीचा पाऊस आहे.

पश्चिम विदर्भातील स्थिती चांगली:

विदर्भातील धरणांच्या जलसाठ्याची स्थिती बघता पश्चिम विदर्भातील स्थिती चांगली आहे.अमरावती विभागात ६९.६१ टक्के जलसाठा आहे.अमरावती विभागातील २६१ प्रकल्पांची एकूण ३ हजार ७७४ दशलक्ष घनमीटर क्षमता असून २ हजार ६२७ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. राज्यात सर्वाधिक जलसाठा असणाऱ्या नागपूर विभागातील ३८३ प्रकल्पांची एकूण ४ हजार ६०६ दलघमी जलसाठा क्षमता आहे. त्यात ३ हजार ५८१ दलघमी जलसाठा आहे.

मराठवाडा विभागाची स्थिती गंभीर:

छत्रपती संभाजीनगर विभागात प्रकल्पामध्ये केवळ ३१.६१ टक्के जलसाठा असल्याची स्थिती असून, मागील वर्षी ती ७४.६४ टक्के एवढी होती.त्यामुळे आता जर पुढील दिवसांत पाऊस न झाल्यास मराठवाड्यातील नागरिकांना पुन्हा एकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता आहे.दरम्यान पावसाळ्याचे सुमारे ३ महिने उलटून गेले आहेत.आता पावसाळ्याचा केवळ एक महिना उरला असून,आता किती टक्के पाऊस पडतो आणि किती टक्के जलसाठा प्रकल्पांमध्ये साठवल्या जातो; यावर पुढील जलसाठ्याचे गणित ठरणार आहे.

प्रकल्पांची सध्यास्थीती;विभाग निहाय टक्केवारी :-

कोकण : ८८. २६

मराठवाडा : ३१.६१

नागपूर : ७७.७५

अमरावती : ६९.६१

नाशिक : ५८.६०

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!