उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- दिवसेंदिवस तळीरामांची संख्या झपाट्याने वाढतच चालली आहे.हल्ली अमुक-तमुक पार्ट्या करून नाच गाण्यांसोबतच दारू ढोसण्याचा ट्रेण्ड वाढलेला दिसून येत आहे.पार्टी असो वा नसो घोटभर दारू पिल्याशिवय अनेकांना जमेना…असे चित्र निर्माण झाले आहे.बरेचसे तळीराम दारूच्या आहारी जाऊन आपले जीव गमावू लागले आहेत.असाच प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील तिडका गावात उघडकीस आला आहे.
तिडका येथील मच्छिंद्र वासुदेव गावतुरे वय २९ वर्षे हा तरुण मद्याच्या धुंदीत ३ फेब्रुवारीच्या रात्री ९ वाजता लघुशंकेकरिता घरातून बाहेर अंगणात गेला; परंतु अंगणात असलेल्या समांतर विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला.या घटनेसंदर्भात मधुकर रामाजी गावतुरे वय ५५ वर्षे,रा.तिडका यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक इलमे करीत आहेत.

