Saturday, May 2, 2026
Homeमुंबईतर पुढील दोन वर्षे विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार...

तर पुढील दोन वर्षे विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-दहावी बारावी बोर्डाची परीक्षा म्हटले की,अभ्यास कमी व टवाळक्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते.अशातच ऐन परीक्षा आली की,अभ्यास न करणारे विद्यार्थी कॉपी करून परीक्षेची उत्तरे सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात.त्यातच काहीजण परीक्षेत मोबाईल तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे परीक्षा हॉलमध्ये नेऊन पेपर सोडविण्याचा प्रयत्न करतात.आता अश्या कॉपी बहाद्दर तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे परीक्षेत चाप बसावा, यासाठी येत्या १५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.विद्यार्थ्यांनी ती पाळली नाही तर ते दोन वर्षे परीक्षेला बसू शकणार नाहीत.या परीक्षांमध्ये मोबाइल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावरील बंदी कायम असून एखाद्या विद्यार्थ्याकडे मोबाइल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण आढळले तर त्याला पुढील दोन वर्षे परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात येणार आहे.यापूर्वी,अशा प्रकरणांमध्ये एका वर्षाच्या बंदीची तरतूद होती.परीक्षेत पारदर्शकता ठेवण्यासाठी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सीबीएसईने सोशल मीडियावर परीक्षेशी संबंधित अफवा पसरवण्याच्या कृत्यालाही अनुचित साधन नियमांत समाविष्ट केले आहे.एखादा विद्यार्थी अफवा पसरवतांना आढळला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल,असा इशारा मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!