- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील धानोरी गावानजिकच्या गोसेखुर्द धरणाच्या(इंदिरा सागर प्रकल्प) मुख्य उजव्या कालव्याच्या मार्गावर आज,मंगळवार ९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास एक वाघ जखमी अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.प्रकरणी परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती तात्काळ वन विभागास दिली.माहिती मिळताच वनाधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वाघ जखमी असल्याने हालचाल करू शकत नव्हता आणि कालव्यात निपचित पडला होता.धानोरी कालव्यातून जखमी झालेल्या वाघाची सुटका करण्यात आली आणि पुढील उपचारांसाठी नागपूरच्या गोरेवाडा बचाव केंद्रात हलवण्यात आले.रात्रीच्या सुमारास अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांनी वाघाला धडक मारली असावी,असा कयास बांधला जातो आहे.यावेळी उपवनसंरक्षक डॉ.योगेंद्र सिंग,सहाय्यक वनसंरक्षक सचिन निळख,सहाय्यक वनसंरक्षक संजय मंढे, सहाय्यक वनसंरक्षक रितेश भोंगाडे,वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश महाजन,वनपरिक्षेत्र अधिकारी रूषाली नागदेवे,वनपरिक्षेत्र अधिकारी विलास बेलखोडे व वन कर्मचारी उपस्थित होते.
- Advertisement -

