उद्रेक न्युज वृत्त :-राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही.शेवटच्या घटकापर्यंत आमचाच अमुक होईल, आमचाच तमुक होईल म्हणणाऱ्यांना चंद्रपूर महानगरपालिकेत जोरदार शॉक बसला आहे.यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे,चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरे गटाने भाजपला अचानक दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजपने सत्तास्थापन करत आपला महापौर बसवला आहे. त्यामुळे,भाजपच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या महापौर झाल्या.तर ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर झाले आहेत.महत्वाचे म्हणजे,एकूण ६६ नगरसेवक असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे २७ नगरसेवक,काँग्रेस समर्थित जनविकास सेनेचे ३,भाजपचे २३,शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ६, वंचित बहुजन आघाडीचे २,बसपा १,शिवसेना शिंदे गट १,अपक्ष २ व एमआयएम १ इत्यादी नगरसेवक निवडून आले होते.सर्वात जास्त काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असल्याने काँग्रेचा महापौर बनेल,अशी अनेकांची मनधारणा झाली होती.मात्र,राजकारणाची सूत्रे वेगळीच जुळल्याने गणित फिस्कटला आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.अश्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रपूरमधील राजकारणावर प्रतिक्रिया देतांना म्हटले की,चंद्रपूरच्या घटनेचे पक्षातून कुणीही समर्थन केले नाही.भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेसाठी जाण्याची पक्षाची भूमिका नाही.मुंबईच्या महापौर संदर्भात भूमिका घेतली आणि ती जाहीरपणे घेतली.पण,चंद्रपूरमध्ये काही भूमिका घेतली असेल तर पक्ष त्याची दखल घेईल, परभणी महापालिकेमध्ये काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिल्याने आभार मानतो,पण चंद्रपूरमध्ये ज्यांनी शेण खाल्लं त्यांच्यावर कारवाई होईल.चंद्रपूरमध्ये जे आमच्या पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेतला ती आमची भूमिका नाही.त्याचे आम्ही समर्थन करत नाही.स्थानिक नेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी काही निर्णय घेतले असतील, तर त्यांच्यावर कारवाई होईल,असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
चंद्रपूरमध्ये ज्यांनी शेण खाल्लं; त्यांच्यावर कारवाई होईल- संजय राऊत
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

