Sunday, September 6, 2026
Homeगोंदियागावकऱ्यांचा सरपंचाला दे धक्का; सरपंच पदावरून हटवले..

गावकऱ्यांचा सरपंचाला दे धक्का; सरपंच पदावरून हटवले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-विकास कामे करतांना सदस्यांना डावलणे, कामांसाठी पैशांची मागणी करणे,शासकीय जमिनीचे बेकायदेशीर प्लॉटिंग करून आर्थिक व्यवहार करणे,
वकिली पेशाचा धाक दाखवून गावकऱ्यांना धमकावणे आणि विरोधात बोलणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवून पदाचे वर्चस्व दाखविणाऱ्या थेट सरपंचास गावकऱ्यांनी घरचा रस्ता दाखविल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील खुर्शिपार ग्रामपंचायतीत उघडकीस आली. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्याचा अखेर धक्कादायक अंत झाला आहे.सरपंच हेमलता चव्हाण यांच्याविरुद्ध मांडण्यात आलेला अविश्वास ठराव तब्बल ६६० विरूध्द शून्य अशा ऐतिहासिक फरकाने मंजूर झाला आहे.विशेष म्हणजे, सभेला उपस्थित असलेल्या एकाही मतदाराने सरपंचांच्या बाजूने मतदान केले नाही,ज्यामुळे चव्हाण यांना आपले पद गमवावे लागले आहे.सोमवार १९ जानेवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंचांनी सरपंचांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला होता.तहसीलदारांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांनी आपला रोष मतदानातून व्यक्त केला.प्रकरणी सरपंच हेमलता चव्हाण यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.आपल्यावर अन्याय होत असून जातीपातीचे राजकारण केले जात असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, ‘गावकरी ते राव न करी’ याप्रमाणे गावकऱ्यांनी रोष व्यक्त करून सरपंचाला पदावरून हटवले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!