- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी ७ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्री पासून ते २१ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. नक्षलवाद्यांकडून ‘पीएलजीए सप्ताहा’दरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसक व गंभीर घटना घडवण्याची शक्यता तसेच विविध राजकीय पक्ष,संघटनांकडून मोर्चे,आंदोलने होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१) आणि (३) अन्वये हा निर्णय घेण्यात आला आहे.या काळात शस्त्रे,स्फोटक पदार्थ किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बरोबर नेण्यास सक्त मनाई आहे.याव्यतिरिक्त, कोणतेही दाहक किंवा उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दर्शवणारे आवेशपूर्ण भाषण,घोषणा,चित्रे किंवा चिन्हे यांचे प्रदर्शन करण्यास बंदी आहे.विशेषतः, उपविभागीय दंडाधिकारी किंवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मिरवणूक काढण्यास मनाई असून,सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.हे सर्व प्रतिबंध संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी लागू राहतील,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
- Advertisement -

