Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीकृषी विभागाच्या वतीने 'शाश्वत शेती दिन' उत्साहात साजरा..

कृषी विभागाच्या वतीने ‘शाश्वत शेती दिन’ उत्साहात साजरा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-हरितक्रांतीचे जनक भारतरत्न डॉ. एम.एस.स्वामीनाथन यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून गडचिरोली येथे ‘शाश्वत शेती दिन’ कृषी विभागाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. समाजकल्याण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला,तर कृषी तज्ज्ञांनी नैसर्गिक,सेंद्रिय व शाश्वत शेतीच्या विविध पद्धतींबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि डॉ. स्वामीनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी शाश्वत शेतीविषयी सखोल विचार मांडले.कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर,कृषी उपसंचालक मधुगंधा जुलमे,कृषी विकास अधिकारी किरण खोमणे,जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी अधिकारी प्रदीप तुमसरे,कृषी तज्ज्ञ बोथीकर आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
शाश्वत शेती म्हणजे पर्यावरणपूरक,खर्चिक इनपुटशिवाय अधिक उत्पादन देणारी शेती.याबाबत मार्गदर्शन करतांना तज्ज्ञांनी सेंद्रिय खतांचा वापर, पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन,पिकांची फेरपालट, कीडनियंत्रणाचे पर्यायी उपाय यासारख्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा यावरही सविस्तर चर्चा झाली.यावेळी जिल्ह्यात नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून यशस्वी कामगिरी करणाऱ्या काही प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.त्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या शेतकऱ्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी शाश्वत शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. पर्यावरण-संवेदनशील व टिकाऊ शेतीच्या माध्यमातूनच भावी पिढ्यांचे अन्नसुरक्षेचे स्वप्न साकार होईल,असे त्यांनी सांगितले.सदरचा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी,मार्गदर्शक आणि विचारप्रवर्तक ठरला.शाश्वत शेतीच्या दिशेने गडचिरोली जिल्ह्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी या उपक्रमामुळे नक्कीच दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!