Wednesday, June 24, 2026
Homeनागपूरउद्या होणारी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी रद्द..

उद्या होणारी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी रद्द..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपुर :-मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उद्या,बुधवार ३ डिसेंबर होणारी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी रद्द केली आहे. येत्या २० डिसेंबरला उर्वरित ठिकाणी मतदान झाल्यानंतर २१ डिसेंबरला एकत्रित मतमोजणी करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायकोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. निकाल,निवडणूक पुढे जात आहेत.ही काही योग्य पद्धत नाही.निवडणूक आयोग,खंडपीठ स्वायत्त आहे,त्यामुळे ते मान्य करावे लागेल.पण यातून भ्रमनिरास होतो.काही चूक नसतांना असे होणे योग्य नाही असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास २४ नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती.ही निवडणूक २० डिसेंबरला होणार होती.त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा २४ नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो,अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.याबाबतचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे २१ डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.आज मतदान झाले तरी त्याचे निकाल २१ तारखेला जाहीर करा. तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही २० तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्धा तासाने जाहीर करता येतील.तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत  निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही २० डिसेंबरपर्यंत लागू राहील,असे न्यायालयाने स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी हायकोर्टाच्या निकालावर भाष्य करतांना म्हटले की, “मी निकाल वाचलेला नाही.पण जर खंडपीठाने निर्णय दिला असेल तर तो मान्य करावा लागेल.पण जवळपास गेली २५ ते ३० वर्ष मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहत आहे. पण असे पहिल्यांदा घडत आहे की,घोषित केलेल्या निवडणुका,त्यांचे निकाल पुढे चालले आहेत.ही पद्धत  योग्य वाटत नाही.अर्थात खंडपीठ स्वायत्त असल्याने त्यांचा निर्णय मान्य करावा लागेल”. “जिथे सगळ्या गोष्टींचे पालन झाले आहे तिथे कोणीतरी कोर्टात गेले. कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही.पण फक्त कोर्टात गेल्याने निवडणुका पुढे नेणे हे कोणत्याच तत्वात बसत नाही. हे अतिशय चुकीचे घडले आहे.मी त्याबाबत अधिक बोलणार नाही.मी यासंदर्भात वैयक्तिक नाराजी आधीही प्रकट केली असून,ती निवडणूक आयोगावर नसून कायद्यावर आहे,” असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.”फक्त २४ ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत,म्हणून सगळी मतमोजणी पुढे करणे मला तरी योग्य वाटत नाही,” असेही ते म्हणाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!