Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउद्यापासून तापमानात बदल; वादळासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता..

उद्यापासून तापमानात बदल; वादळासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी हवामान खात्याने दिलासादायक अंदाज वर्तविला आहे.उद्या,शुक्रवार १३ मार्च ते १५ मार्चपर्यंत काही ठिकाणी ढगाळ वातावरण व वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.विदर्भातील काही जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून कमाल तापमानातील चढउतारामुळे नागरिक हैराण झाले आहेत.बहुतेक जिल्हे उन्हाच्या झळांनी त्रस्त आहेत.तीन दिवसांपूर्वी उच्चांक गाठलेले अकोल्याचे तापमान अद्यापही जास्त आहे.काल,
बुधवारी अकोल्यात ४१ अंश तापमान नोंदवण्यात आले, तर अमरावतीत ४०.४ अंश आहे.चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी शहरातही तापमान ४० अंशापर्यंत गेले आहे. नागपूरमध्ये तापमान ३८.४ अंश नोंदवण्यात आले,जे सरासरीपेक्षा ३.२ अंश अधिक आहे.त्यातच,चंद्रपूर ३८.२ अंश,तर वर्धा,वाशिम आणि बुलढाणा ३९ अंश सेल्सीअस सरासरीत आहेत.समजा,उन-पावसाचा खेळ सुरू राहिला तर जीवाची लाही-लाही झाल्याशिवाय राहणार नाही.कारण की,पुढील महिने ही तपोवनातील उष्ण तापमानाची असतात.त्यामुळे,नागरिकांनी उन्हापासून बचाव करणे गरजेचे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!