Monday, May 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही.. - उद्यापासून पाण्याचा एक थेंबही घेणार नाही.....

आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही.. – उद्यापासून पाण्याचा एक थेंबही घेणार नाही.. – आंदोलक मनोज जरांगे पाटील

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आरक्षण मिळावे,यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर २९ ऑगस्ट पासून आंदोलन सुरू आहे.आज,रविवार आंदोलनाचा तिसरा दिवस सुरू आहे.आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसले असून लाखो मराठा समाज बांधवांचा जत्था मुंबईत ठाण मांडून बसला आहे.काल शनिवारी बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील नागरिकांनी टेम्पो भरून भाकरीसोबत ठेचा व इतर साहित्य मुंबईतील आंदोलनकर्त्यांना पाठवून एकप्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासली.अश्यातच आज रविवारी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी कडक उपोषणाचा इशारा दिला आहे.आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण तसेच मुंबई सोडणार नाही व उद्यापासून शरीरात पाण्याचा एक थेंबही घेणार नाही,असा पवित्रा घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.त्यातच आंदोलनकर्त्यांनी घाई गडबड,दगडफेक,गोंधळ करु नये,आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय इथून हटणार नसल्याचे स्पष्ट केले. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे,ते मिळाल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही.जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर पुढील काळात महाराष्ट्रातील मराठा लोक बाहेर पडतील. त्यानंतर मुंबई तर सोडा येथून दोनशे किलोमीटर माणसे पाहायला मिळतील.मी जे बोलतो ते करतोच हे सर्वांना माहिती आहे.असेही ते म्हणाले.त्यामुळे आता मराठा आरक्षणावर सरकार काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.त्यातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची डोकेदुखी वाढण्याची नाकारता येणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!