Tuesday, September 1, 2026
Homeमुंबईआमच्या ओबीसीच्या आरक्षणात दुसरे वाटेकरी नको- मंत्री छगन भुजबळ

आमच्या ओबीसीच्या आरक्षणात दुसरे वाटेकरी नको- मंत्री छगन भुजबळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-मुंबईच्या आझाद मैदानावर २९ ऑगस्ट पासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा समाज बांधव आंदोलन करीत आहेत. आज,सोमवार १ सप्टेंबर रोजी आंदोलनाचा चौथा दिवस होता.आंदोलकांमुळे मुंबईतील जनजीवन विस्कळित होऊ लागल्याचे आज सरकारने उच्च न्यायालयात स्पष्ट केले.त्यानुसार न्यायालयाने सरकारने तात्काळ थेट पाऊले उचलून कायदेशीर मार्गाने आंदोलन केले जातेय की नाही,अशी भूमिका स्पष्ट करण्याची ताकीद दिली. अश्यातच मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे,ते मिळाल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही.अशी भूमिका घेतल्याने ओबीसी नेते तथा ओबीसी समाज बांधव याचा तीव्र विरोध दर्शवू लागले आहेत.त्यानुसार नागपूरच्या संविधान चौकात ओबीसी महासंघाच्या वतीने ३० ऑगस्ट पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आला आहे.त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी नेत्यांची आज सोमवारी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.बैठकीस राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.तसेच,मराठा आणि कुणबी एक,हा मूर्खपणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.ओबीसी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीची मराठा आंदोलनावरील भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली आहे.त्यांनी म्हटले की,मराठा कुणबी एक होऊ शकत नाही.५० टक्के आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या मागास असणाऱ्यांसाठी आहे. पण, मराठा समाज हा सामाजिक मागास ठरत नाही,असे भुजबळ म्हणाले.आमच्या ओबीसीच्या आरक्षणात दुसरे वाटेकरी नको असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.शरद पवार असो की देवेंद्र फडणवीस कोणीही ओबीसीमध्ये, एससीमध्ये व एसटीमध्ये नवीन जात टाकू शकत नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला तर लाखोंच्या संख्येने मुंबईत येणार असल्याचे भुजबळ म्हणाले.आमदारांनी मागणी केली म्हणजे कायदा होत नाही.उद्या कुणीही काहीही मागणी करेल,अधिवेशनात ठराव केला तरी होत नाही,नियमाचा रस्ता आहे,त्यानुसार जावे लागेल असेही मंत्री भुजबळ म्हणाले.त्यामुळे आता मराठा वर्सेस ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजल्याशिवाय राहणार नाही,असे दिसून येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!