Monday, May 25, 2026
Homeमुंबईआमच्या ओबीसीच्या आरक्षणात दुसरे वाटेकरी नको- मंत्री छगन भुजबळ

आमच्या ओबीसीच्या आरक्षणात दुसरे वाटेकरी नको- मंत्री छगन भुजबळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-मुंबईच्या आझाद मैदानावर २९ ऑगस्ट पासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा समाज बांधव आंदोलन करीत आहेत. आज,सोमवार १ सप्टेंबर रोजी आंदोलनाचा चौथा दिवस होता.आंदोलकांमुळे मुंबईतील जनजीवन विस्कळित होऊ लागल्याचे आज सरकारने उच्च न्यायालयात स्पष्ट केले.त्यानुसार न्यायालयाने सरकारने तात्काळ थेट पाऊले उचलून कायदेशीर मार्गाने आंदोलन केले जातेय की नाही,अशी भूमिका स्पष्ट करण्याची ताकीद दिली. अश्यातच मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे,ते मिळाल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही.अशी भूमिका घेतल्याने ओबीसी नेते तथा ओबीसी समाज बांधव याचा तीव्र विरोध दर्शवू लागले आहेत.त्यानुसार नागपूरच्या संविधान चौकात ओबीसी महासंघाच्या वतीने ३० ऑगस्ट पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आला आहे.त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी नेत्यांची आज सोमवारी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.बैठकीस राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.तसेच,मराठा आणि कुणबी एक,हा मूर्खपणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.ओबीसी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीची मराठा आंदोलनावरील भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली आहे.त्यांनी म्हटले की,मराठा कुणबी एक होऊ शकत नाही.५० टक्के आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या मागास असणाऱ्यांसाठी आहे. पण, मराठा समाज हा सामाजिक मागास ठरत नाही,असे भुजबळ म्हणाले.आमच्या ओबीसीच्या आरक्षणात दुसरे वाटेकरी नको असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.शरद पवार असो की देवेंद्र फडणवीस कोणीही ओबीसीमध्ये, एससीमध्ये व एसटीमध्ये नवीन जात टाकू शकत नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला तर लाखोंच्या संख्येने मुंबईत येणार असल्याचे भुजबळ म्हणाले.आमदारांनी मागणी केली म्हणजे कायदा होत नाही.उद्या कुणीही काहीही मागणी करेल,अधिवेशनात ठराव केला तरी होत नाही,नियमाचा रस्ता आहे,त्यानुसार जावे लागेल असेही मंत्री भुजबळ म्हणाले.त्यामुळे आता मराठा वर्सेस ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजल्याशिवाय राहणार नाही,असे दिसून येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!