- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात सामाजिक ऐक्य,राष्ट्रीय, स्वतंत्रता,स्वाभिमान व स्वभाषेचे प्रतीक म्हणून महाराष्ट्राचा गणेशोत्सव १८९३ रोजी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरित्या सुरु केला.परंपरेनुसार आजही देशभरात मोठ्या भक्तिभावाने तितक्याच उत्साहात सार्वजनिक गणेश उत्सव सर्वत्र मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आहे.त्यामुळे भाजपाचे कसबा पेठ येथील आमदार नारायण रासने यांनी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात यावा,अशी मागणी विधानसभेत केली.त्यानुसार लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या व मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ म्हणून आज,गुरुवार १० जुलै रोजी विधानसभेत घोषित करण्यात आले.सदरची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड.आशिष शेलार यांनी केली.घोषणा करतांना मंत्री शेलार म्हणाले की,देशात नाहीतर जगात गणेशोत्सवाची व्याप्ती,संस्कृती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटीबद्ध असणार आहे. पण,काही लोकांनी वेगवेगळ्या कारणाने गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला कुठे ना कुठे बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशातच सगळ्या निर्बंधांना, आलेल्या स्पिड ब्रेकरला बाजूला करण्याचे काम महायुती सरकारने अतिशय शीघ्रतेने केले आहे.महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असलेला आपला गणेशोत्सव आहे.त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ म्हणून आजच घोषित करण्यात येत असल्याचे शेलार यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
- Advertisement -

