Friday, June 19, 2026
Homeनागपूरआता महावितरण सुरू करणार 'स्मार्ट मीटर योजना'..-वीज वापरकर्त्यांना मोबाईल फोनच्या प्रमाणेच वीजेसाठी...

आता महावितरण सुरू करणार ‘स्मार्ट मीटर योजना’..-वीज वापरकर्त्यांना मोबाईल फोनच्या प्रमाणेच वीजेसाठी द्यावे लागणार पैसे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- १ एप्रिलपासून राज्यभरात पारंपरिक मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार होते.मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता लागल्याने योजनेची अंमलबजावणी थांबली आहे.आता ४ जून रोजी मतमोजणी झाल्यानंतर आचारसंहीता संपेल.त्या नंतर योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

स्मार्ट मीटर असल्याने वीज खर्च आता निम्म्याने कमी होईल असा दावा केला जात आहे.स्मार्ट मीटर बसवल्यानंतर,वीज वापरकर्ते मोबाईल फोनच्या प्रमाणेच वीजेसाठी पैसे देतील.वीजेवर किती खर्च करायचा हे ग्राहक निवडू शकतात.ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनद्वारे नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या विजेच्या प्रमाणात माहिती मिळेल.

परिणामी,ग्राहकांना बिल भरल्यानंतर किती पैसे शिल्लक राहतात आणि आर्थिक नियोजनानुसार किती वीज वापरली पाहिजे हे समजेल.याचा अर्थ असा की ग्राहक विजेचा वापर अधिक काटकसरीने करतील कारण त्यांना ते रिचार्ज करण्यासाठी पैसे द्यावे लागतील,त्यांचे लाइट बिल कमी होईल.

महावितरणने थकबाकीचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्यभर स्मार्ट प्रीपेमेंट मीटर तैनात करण्याची योजना आखली आहे.पहिल्या टप्प्यात,बिल वेळेवर न भरणाऱ्या ग्राहकांना प्रीपेड मीटर दिले जातील, तर उर्वरित ग्राहकांना स्मार्ट मीटर दिले जातील.प्रीपेड मीटर रिफिलिंग केल्यावर वीज पुरवली जाईल.या मीटरसाठी ग्राहकांना काहीही पैसे द्यावे लागणार नाहीत.मीटरच्या किमतीवर केंद्र सरकार अनुदान देईल.

स्मार्ट मीटर हे आयओटी तंत्रज्ञानावरती आधारित आहे.यामध्ये ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनद्वारे त्यांनी केलेल्या वीज वापराची माहिती वेळोवेळी दिली जाणार आहे व ती माहिती ते कुठूनही पाहू शकतात किंवा त्यांच्या घराच्या मीटरचे रिचार्ज करू शकतात. त्यामुळे ग्राहकांचे वीज वापरावरती नियंत्रण राहणार आहे.रात्री,बेरात्री,सुटीच्या दिवशी रिचार्ज केलेला नसल्यास वीज पुरवठा खंडीत होणार नाही,अशी माहिती मिळाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!