Monday, May 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता पोहे,मैदाही मिळणार आनंदाच्या शिध्यात…..

आता पोहे,मैदाही मिळणार आनंदाच्या शिध्यात…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्य सरकार दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देणार आहे. यापूर्वी त्यात रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल या चार वस्तूंचा समावेश होता. त्यात आता पोहे व मैदा या आणखी दोन वस्तूंची भर पडली आहे. शंभर रुपयांतच या ६ वस्तू मिळतील. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, दोन वस्तूंचा ‘बोनस’ देताना सरकारने एक चलाखी केली आहे. पूर्वी साखर, रवा व चणाडाळ प्रत्येकी एक किलो व तेलही एक लिटर दिले जात होते. आता सरकारने पूर्वीच्या २ वस्तूंच्या वजनात कपात केली आहे. साखर पूर्वीप्रमाणे एक किलो व तेल एक लिटर मिळणार आहेच. पण रवा, चणाडाळ, मैदा आणि पोहे मात्र फक्त अर्धा किलोच मिळणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील जिल्हे आणि वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील १ कोटी ६६ लाख लाभार्थींना आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत वितरित केला जाईल. यासाठी ५३० कोटी १९ लाख मंजूर केले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!